शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दोन मोबाईल नंबर कसे लक्षात ठेवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मोबाईलने व्यक्तीला आता कुठलेच नंबर लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही. याचा प्रत्यय रत्नागिरी शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मोबाईलने व्यक्तीला आता कुठलेच नंबर लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही. याचा प्रत्यय रत्नागिरी शहरात मिळाला. दहापैकी सात नवरोबांना आपल्या पत्नीचा नंबरही आठवत नसल्याचे निदर्शनास आले. याचे स्पष्टीकरण देताना काहींनी बायकोचे एकापेक्षा अधिक नंबर असल्याने कसे लक्षात ठेवणार, असा प्रतिप्रश्न केला. काहींनी नंबर मोबाईलमध्येच सेव्ह आहे तर लक्षात कशाला ठेवायचे असे सांगितले. मात्र, तीनजणांनी न अडखळता नंबर सांगितले. घरात दूरध्वनी असलेल्यांच्या लक्षात मात्र हे नंबर असल्याचे दिसून आले.

शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी केलेल्या या रिॲलिटी चेकमध्ये दहापैकी सातजणांना आपल्या बायकोचा नंबर लक्षात नव्हता, तो मोबाईलमध्ये बघून सांगावा लागला. बहुसंख्य बायकांनाही आपल्या नवऱ्याचा नंबर चटकन सांगता आला नाही; परंतु मुलांना मात्र आपल्या आई-वडिलांचे मोबाईल नंबर पाठ होते. विशेष म्हणजे काही मुलांना तर आई-वडिलांचे दोन्ही नंबरही पटकन सांगता आले.

मुलांना आठवते, मोठ्यांना का नाही?

मोबाईलमध्ये असंख्य लोकांचे नंबर संचित करता येतात. त्यामुळे नंबर हवा असेल तर तो आठवण्याचा प्रयास फारसा कुणी करत नाही त्यामुळे तो पटकन आठवतही नाही. मुलांची बुद्धी कुशाग्र असते. या वयात नंबरही चांगले लक्षात राहतात. त्यामुळे मुले आई-वडिलांचे नंबर चटकन सांगतात.

- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी

लोकमत@रत्नागिरी

- एकाला बायकोचा पहिला नंबर चटकन सांगता आला.

- एकाला बायकोचा एक नंबर सांगता आला, पण दुसरा नंबर मोबाईलवर पहावा लागला.

- एकाला आपला आणि बायकोचा पहिल्यापासून वापरात असलेला नंबर सांगता आला. मात्र, दुसरे नंबर लक्षात राहिलेले नाहीत.

- एकाच्या लक्षात बायकोचे दोन्ही नंबरही होते.

- एकाला बायकोचा नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सांगताच येईना.

- एकाने एवढे नंबर असतात, लक्षात कसे रहाणार? मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, तर बुद्धीला ताण कशाला द्या, असे सांगून विषय झटकला.

- एका वृद्ध व्यक्तीला बायकोचा नंबर लक्षात नव्हता, पण मुलाचा नंबर लक्षात होता.

- एका प्रौढ व्यक्तीच्या लक्षात बायकोचा नंबर नव्हता, पण मुलीचा नंबर सांगता आला.