शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

दोन मोबाईल नंबर कसे लक्षात ठेवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मोबाईलने व्यक्तीला आता कुठलेच नंबर लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही. याचा प्रत्यय रत्नागिरी शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मोबाईलने व्यक्तीला आता कुठलेच नंबर लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही. याचा प्रत्यय रत्नागिरी शहरात मिळाला. दहापैकी सात नवरोबांना आपल्या पत्नीचा नंबरही आठवत नसल्याचे निदर्शनास आले. याचे स्पष्टीकरण देताना काहींनी बायकोचे एकापेक्षा अधिक नंबर असल्याने कसे लक्षात ठेवणार, असा प्रतिप्रश्न केला. काहींनी नंबर मोबाईलमध्येच सेव्ह आहे तर लक्षात कशाला ठेवायचे असे सांगितले. मात्र, तीनजणांनी न अडखळता नंबर सांगितले. घरात दूरध्वनी असलेल्यांच्या लक्षात मात्र हे नंबर असल्याचे दिसून आले.

शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी केलेल्या या रिॲलिटी चेकमध्ये दहापैकी सातजणांना आपल्या बायकोचा नंबर लक्षात नव्हता, तो मोबाईलमध्ये बघून सांगावा लागला. बहुसंख्य बायकांनाही आपल्या नवऱ्याचा नंबर चटकन सांगता आला नाही; परंतु मुलांना मात्र आपल्या आई-वडिलांचे मोबाईल नंबर पाठ होते. विशेष म्हणजे काही मुलांना तर आई-वडिलांचे दोन्ही नंबरही पटकन सांगता आले.

मुलांना आठवते, मोठ्यांना का नाही?

मोबाईलमध्ये असंख्य लोकांचे नंबर संचित करता येतात. त्यामुळे नंबर हवा असेल तर तो आठवण्याचा प्रयास फारसा कुणी करत नाही त्यामुळे तो पटकन आठवतही नाही. मुलांची बुद्धी कुशाग्र असते. या वयात नंबरही चांगले लक्षात राहतात. त्यामुळे मुले आई-वडिलांचे नंबर चटकन सांगतात.

- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी

लोकमत@रत्नागिरी

- एकाला बायकोचा पहिला नंबर चटकन सांगता आला.

- एकाला बायकोचा एक नंबर सांगता आला, पण दुसरा नंबर मोबाईलवर पहावा लागला.

- एकाला आपला आणि बायकोचा पहिल्यापासून वापरात असलेला नंबर सांगता आला. मात्र, दुसरे नंबर लक्षात राहिलेले नाहीत.

- एकाच्या लक्षात बायकोचे दोन्ही नंबरही होते.

- एकाला बायकोचा नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सांगताच येईना.

- एकाने एवढे नंबर असतात, लक्षात कसे रहाणार? मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, तर बुद्धीला ताण कशाला द्या, असे सांगून विषय झटकला.

- एका वृद्ध व्यक्तीला बायकोचा नंबर लक्षात नव्हता, पण मुलाचा नंबर लक्षात होता.

- एका प्रौढ व्यक्तीच्या लक्षात बायकोचा नंबर नव्हता, पण मुलीचा नंबर सांगता आला.