शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जगायचे कसे? घरगुती गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू असतानाच विविध प्रकारच्या महागाईने डोके वर काढले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू असतानाच विविध प्रकारच्या महागाईने डोके वर काढले आहे. अन्नधान्ये, कडधान्ये, तेले, भाज्या याचबरोबर इंधनाचे दरही भरमसाठ वाढू लागले आहेत. त्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरचे दरही भरमसाठ वाढू लागल्याने त्याचा वापर सामान्याच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. ग्रामीण जनतेचे तर त्याहून हाल झाले असून गावांमध्ये चुली पेटविण्यासाठी आता सरपणच उपलब्ध नाही.

गेल्या सात महिन्यात घरगुती वापराचा गॅस महागल्याने जगायचे, ही चिंता सामान्यांना सतावू लागली आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजना केवळ नावापुरती उरली आहे. त्यामुळे आता या लोकांनाही महागडा गॅस वापरणे अशक्य झाले आहे.

घर खर्च भागवायचा कसा ?

गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. अजूनही लॉकडाऊनचा फटका बसत आहे. असे असताना सरकारने घरगुती गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यायला हवा. कोरोनाच्या काळात दर आणखीनच वाढले आहेत. सामान्य माणसाने जगायचे कसे?

- स्मिता बागडे, गृहिणी, रत्नागिरी

गेल्या वर्षापासून अन्नधान्य, तेले, भाज्या यांचे दर भरमसाठ वाढले आहेत. आधीच लोकांचे पगार कमी झाले, काहींचे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. असं असतानाच कुटुंब पोसायचं कसं, ही चिंता आहे. त्यातच घरगुती गॅसही महागल्याने आता इतर खर्च कसा भागवायचा, ही काळजी आमच्या समोर उभी आहे.

- रेखा सावंत, गृहिणी, रत्नागिरी

पुन्हा चुलीसाठी गावात सरपणही मिळेना

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. सुरुवातीला मोफत गॅस सिलिंडर जोडणीसह मिळाला. आता मात्र, त्यांना गॅस भरण्याचे पैसे द्यावे लागतात.

ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही. लाकूडतोड कायद्याने थांबली असल्याने सरपणही मिळत नाही, त्यामुळे चूलही पेटवता येत नाही. गॅस महागला आता जगायचे कसे, असा प्रश्न ग्रामीण गृहिणी विचारत आहेत.

डिसेंबर महिन्यात उच्चांकी वाढ

कोरोनाचे संकट गेल्या मार्चमध्ये आल्याने सरकारने लॉकडाऊन सुरू केले. या काळात मंदीचे सावट असतानाच डिसेंबर २०२० मध्ये घरगुती गॅस सिलिंडर ६०५ रुपयांवरून ६५५ आणि पुन्हा ७०५ रुपये असा झाला. या एकाच महिन्यात १०० ने वाढ झाली.