शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत संपल्याने बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ मेपर्यंतच ग्राह्य धरली गेल्याने त्याचा फटका नुकत्याच झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ मेपर्यंतच ग्राह्य धरली गेल्याने त्याचा फटका नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळातील हानी झालेल्या कोकणातील आंबा व्यावसायिकांना बसला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत संपल्याने हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असून नेमलेली मुदत वाढविण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचतर्फे देण्यात आला आहे.

कोकणातील बहुतांशी आंबा व्यावसायिक कराराने आंबा बागा घेतात. शिवाय व्यवसायासाठी विविध वित्तीय संस्थांसह बँकांची कर्ज घेतात. सुरक्षितता म्हणून अनेकांनी संभाव्य नैसर्गिक संकटाचा विचार करून आर्थिक जोखमीला हातभार म्हणून पंतप्रधान पीक विमा योजनेचा आधार स्वीकारला. मात्र, लाभ मिळण्यासाठी असलेली तारीख उलटून गेल्याने अनेकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

तौक्ते चक्रीवादळ झाले. गतवर्षी निसर्ग वादळ झाले. निसर्ग वादळातही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ झाला नाही. वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची अपरिमित आर्थिक हानी झाली. त्यातच यंदा आंबा उत्पादन कमी होते. शिवाय कर्ज घेतलेले शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळेल ही आशा होती. मात्र, योजनेची मुदत केवळ १५ मे पर्यंतच ग्राह्य धरण्यात येत असल्याचे सांगून लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना कॅश क्रेडिट (सी.सी.) योजनेंतर्गत नुकसानभरपाई द्यावी. आंबा बागायतदार आणि कराराने बाग घेणारे व्यापारी यांच्यात आंबा पीक काढण्याचे परस्पर दोघांच्या सहमताने व सामंजस्याने करार, व्यवहार होत असतात. कर्ज प्रकरणात वा पंतप्रधान पीक विमा योजनासह तत्सम इतर विमा कंपनीचे विमा उतरवले जातात. त्याची रक्कम कराराने पीक काढणारा शेतकरी भरतो. शासनाने पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जातून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आंब्याचा हंगाम असल्याने निकष बदल्याची मागणी होत आहे. लॉकडाऊन संपताच आंबा व्यावसायिकांची बैठक घेऊन न्याय मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा समविचारी मंचाने दिला आहे.

समविचारी मंचाचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, महासचिव श्रीनिवास दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, राज्य महिला समन्वयक राधिका जोगळेकर, महिलाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी (रत्नागिरी), अ‍ॅड. वर्षा पाठारे (रायगड), मानसी सावंत (सिंधुदुर्ग) यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी न्याय मागून न्याय न मिळाल्यास कोकण स्तरावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.