शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

होळीमुळे एसटीची झोळी भरलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सव उत्त्साहात साजरा करण्यात येतो. कोराेनामुळे सणावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. ग्रामस्तरावरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सव उत्त्साहात साजरा करण्यात येतो. कोराेनामुळे सणावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. ग्रामस्तरावरही उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मुंबईकर मात्र उत्सवासाठी गावी येऊ लागले आहेत. रत्नागिरी विभागात मुंबईकडून जादा गाड्या सोडण्यात येत असून दि. २ एप्रिलपर्यंत १६५ जादा गाड्या मुंबई व उपनगरातून येणार आहेत.

ग्रामदेवतेची पालखी शिमगोत्सवात घरोघरी येते. यावर्षी पालखी घरोघरी येणार नसली तरी सहाणेवर भाविकांना दर्शनासाठी थांबणार आहे. काही गावातून पालखी मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोराेना रुग्ण वाढत असल्याने संसर्ग बळावू नये, यासाठी शासनाने निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असला तरी भाविक ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गावी येत आहेत. मुंबईकरांसाठी रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा १६५ गाड्यांचे नियाेजन करण्यात आले असून प्रवाशांचा त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतरच गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

n मुंबई, तसेच उपनगरातून होळीसाठी १६५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

n दररोज १५० गाड्या मुंबई व उपनगरे, पुणे मार्गावर साेडण्यात येत आहेत.

n कर्नाटक राज्यातील गाड्या सध्या बंद असून कोल्हापूरपर्यंत साेडण्यात येत आहे.

n ग्रामीण असो वा शहरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहेत.

दररोज १५० गाड्या

जिल्ह्यात नऊ आगारातून मुंबई तसेच उपनगरे व पुणे मार्गावर दररोज १५० गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभत असल्यामुळे अद्याप एकही गाडी कमी करण्यात आलेली नाही. शिवशाही, लालपरी बसेसना प्रवाशांची पसंती लाभत आहे. गर्दी असो वा नसो एसटीचे तिकीट दर बदलत नसल्याने प्रवाशांना खात्री आहे.

जिल्ह्यात भद्रे व तेरसे असे दोन प्रकारचे शिमगे साजरे होत असल्याने दि.२५ पासूनच जादा गाड्यांचे आगमन सुरू झाले आहे. दि.२ एप्रिलपर्यत गाड्या जिल्ह्यात येणार आहेत. मास्कशिवाय प्रवाशांना एसटीत प्रवेश दिला जात नाही. शिवाय सॅनिटाझर वापरण्याची सूचनाही केली जात असून प्रवासी त्याचे पालन करीत आहेत.

- सुनील भोकरे,

विभाग नियंत्रक, रत्नागिरी

रत्नागिरी विभागातून दररोज मुंबई, बोरीवली, नालासोपारा, ठाणे, विरार, कल्याण, विठ्ठलवाडी, पुणे, स्वारगेट मार्गावर दररोज १५० गाड्या नियमित सोडण्यात येत असल्या तरी त्यामध्ये ७२ रातराणी गाड्यांचा समावेश आहे. एसटीबद्दल सुरक्षिततेबाबतच्या विश्वासार्हतेमुळेच प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.

ऑनलाइन आरक्षण

रत्नागिरी विभागातून लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांसह जादा गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण उपलब्ध आहे. ऑनलाइन आरक्षणाच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. येण्याबरोबर जातानाच्या प्रवासाचेही आरक्षण एकाचवेळी उपलब्ध होत आहे. रंगपंचमीपर्यंत शिमगोत्सव साजरा होत असल्याने गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.