शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

बागायतीला अवकळा

By admin | Updated: March 4, 2015 23:40 IST

खेड तालुका : अवकाळी पावसाने कंबरडे मोडले

खेड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आंबा आणि काजूचे पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादनाला गळती लागल्याने यंदाचे आंबा व काजूपासून मिळणाऱ््या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. अशातच सुके गवत पाण्यात गेल्याने शेतकरी मात्र दुबार संकटात सापडला आहे़ शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारीदेखील कायम राहिला. रविवारी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने अनेकांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागले़ ऐन शिमगोत्सवामध्ये पावसाने संततधार लावल्याने शेतकऱ्यांचे तीनतेरा वाजले आहेत. होळीसाठी साठवून ठेवलेले सुके गवत आणि भारे या पावसामध्ये भिजल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.दोन दिवस कोसळलेल्या पावसाने केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे, तर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवून लावले आहे. खेड तालुक्यातील भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद तसेच बहुतांश गावामधील शेतकऱ्यांची आंबा पिके या पावसाने नष्ट केली आहेत.करटेल गावासह सुकिवली, भरणे, खवटी आणि कशेडी अनेक काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा पावसामध्ये भिजला. हा चारा आता जनावरे खात नाहीत. यामुळे हा चारा सडणार आहे़ सुक्या चाऱ्याखेरीज या शेतकऱ्यांकडे अन्य कोणत्याही प्रकारचा चारा नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यातील खाडीपट्टा आणि पंधरागाव धामणंद आणि भरणे, सुकिवली, खेड परिसरातील अनेक आंबा व काजूच्या बागांवर संकट ओढवले आहे. नुकताच आलेला अांबा पावसामध्ये भिजल्याने उत्पादनाला गळती लागली आहे.किरकोळ स्वरूपात असलेल्या आंबा बागायतदारदेख्ीाल आता चिंतेत सापडले आहेत़ ठिकठिकाणी आंब्याला गळती लागल्याने कोवळ्या आंब्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत. काही झाडांना आलेला मोेहोरही गळून पडला आहे. काजूची अवस्था याहून वेगळी राहिलेली नाही. त्यामुळे अनेक बागायतदारांनी डोक्याला हात लावला आहे.या अस्मानी संकटानंतर हातातोंडाशी आलेली पिके पावसाने नासवल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आता सरकारनेच याबाबत पुढाकार घेऊन कोकणातील आणि विशेषत: खेड तालुक्यातील या पिकांना संरक्षण देण्याची मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे काजूचे पीक हाताबाहेर गेले आहे. आता हे नुकसान कसे भरून काढणार? या पिकावर वर्षाचे अर्थार्जन होत होते. मात्र, आता पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यापलिकडे गेले आहे.- मधुकर चाळके,काजू बागायतदार, सुकिवलीगेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार संकटात सापडला आहे. निसर्गाचे मोठे संकट आल्याने याचा सामना कसा करावा? असा पेच आमच्यासमोर निर्माण झाला आहे.- समीर जाधव,आंबा बागायतदार, कोरेगाव.अवकाळी पावसाने केला घात, जनावरांच्या तोेंडचा घासही घेतला काढून.राज्य शासनाने मदत करण्याची मागणी.भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद परिसरातील आंबा पिके पावाने केली नष्ट.