शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

बागायतीला अवकळा

By admin | Updated: March 4, 2015 23:40 IST

खेड तालुका : अवकाळी पावसाने कंबरडे मोडले

खेड : चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आंबा आणि काजूचे पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादनाला गळती लागल्याने यंदाचे आंबा व काजूपासून मिळणाऱ््या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. अशातच सुके गवत पाण्यात गेल्याने शेतकरी मात्र दुबार संकटात सापडला आहे़ शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारीदेखील कायम राहिला. रविवारी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने अनेकांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागले़ ऐन शिमगोत्सवामध्ये पावसाने संततधार लावल्याने शेतकऱ्यांचे तीनतेरा वाजले आहेत. होळीसाठी साठवून ठेवलेले सुके गवत आणि भारे या पावसामध्ये भिजल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.दोन दिवस कोसळलेल्या पावसाने केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे, तर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवून लावले आहे. खेड तालुक्यातील भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद तसेच बहुतांश गावामधील शेतकऱ्यांची आंबा पिके या पावसाने नष्ट केली आहेत.करटेल गावासह सुकिवली, भरणे, खवटी आणि कशेडी अनेक काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा पावसामध्ये भिजला. हा चारा आता जनावरे खात नाहीत. यामुळे हा चारा सडणार आहे़ सुक्या चाऱ्याखेरीज या शेतकऱ्यांकडे अन्य कोणत्याही प्रकारचा चारा नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यातील खाडीपट्टा आणि पंधरागाव धामणंद आणि भरणे, सुकिवली, खेड परिसरातील अनेक आंबा व काजूच्या बागांवर संकट ओढवले आहे. नुकताच आलेला अांबा पावसामध्ये भिजल्याने उत्पादनाला गळती लागली आहे.किरकोळ स्वरूपात असलेल्या आंबा बागायतदारदेख्ीाल आता चिंतेत सापडले आहेत़ ठिकठिकाणी आंब्याला गळती लागल्याने कोवळ्या आंब्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत. काही झाडांना आलेला मोेहोरही गळून पडला आहे. काजूची अवस्था याहून वेगळी राहिलेली नाही. त्यामुळे अनेक बागायतदारांनी डोक्याला हात लावला आहे.या अस्मानी संकटानंतर हातातोंडाशी आलेली पिके पावसाने नासवल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आता सरकारनेच याबाबत पुढाकार घेऊन कोकणातील आणि विशेषत: खेड तालुक्यातील या पिकांना संरक्षण देण्याची मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे काजूचे पीक हाताबाहेर गेले आहे. आता हे नुकसान कसे भरून काढणार? या पिकावर वर्षाचे अर्थार्जन होत होते. मात्र, आता पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यापलिकडे गेले आहे.- मधुकर चाळके,काजू बागायतदार, सुकिवलीगेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार संकटात सापडला आहे. निसर्गाचे मोठे संकट आल्याने याचा सामना कसा करावा? असा पेच आमच्यासमोर निर्माण झाला आहे.- समीर जाधव,आंबा बागायतदार, कोरेगाव.अवकाळी पावसाने केला घात, जनावरांच्या तोेंडचा घासही घेतला काढून.राज्य शासनाने मदत करण्याची मागणी.भरणे, सुकिवली, सुसेरी, कोरेगाव, संगलट, पंधरागाव, धामणंद परिसरातील आंबा पिके पावाने केली नष्ट.