शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

राजीवडावासीयांकडून १५०० पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा ...

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा केला. तसेच मुरादपूर भागामध्ये सुमारे ४७ पूरग्रस्तांचे जीव वाचवले. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राजीवडा गावातील ६० तरुणांचे पथक आजही पूरग्रस्त भागात कार्यरत आहे.

चिपळुणात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राजीवडा गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या मदतीसाठी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नजीर वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन बोटी घेऊन भातगावमार्गे शब्बीर भाटकर, इमरान सोलकर, आसिफ वस्ता, कमरुद्दीन गडकरी, मुजाहीद तांडेल, सलमान जांभारकर, रशिद वस्ता, सनाऊल्ला गडकरी, शादाब तांडेल आणि रुहान गडकरी हे दर्यावर्दी पथक गेले होते. या लहान बोटी असल्यामुळे काहींनी या पथकाची चेष्टाही केली. मात्र, या पथकाने मुरादपूर परिसरात ४७ पूरग्रस्तांना मदत करुन वाचवले. त्यावेळी एका कारशेडच्या छप्परावर मगर होती. तरीही जीवाची पर्वा न करता या पथकाने मदतकार्य सुरुच ठेवले होते.

पूरग्रस्त भागात पथक कार्यरत असताना राजीवडावासीयांनी गावामध्ये फिरुन अन्नधान्य, पाणी बाटल्या, कपडे, बिस्कीटे आदी मदत गोळा करुन चिपळूणच्या दिशेने रवाना केली. आठवडाभर लोक मदतीसाठी धावाधाव करत होते. राजीवडा गावातून सुमारे २१ गाड्या घेऊन तरुण मंडळी चिपळुणात मदतकार्य करत होती. पेठमाप, गणेश मंदिर, मुरादपूर, खेर्डी, गोवळकोट व अन्य भागातील सुमारे १,५०० लोकांपर्यंत घरोघरी जाऊन मदत केली. सतत तीन दिवस ही मदत सुरु होती.

महापुरानंतर आता चिखल साफ करण्यासाठी राजीवडा गावातील मुफ्ती समिऊल्ला आणि अल्ताफ बुड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या ६० जणांच्या पथकाने गेल्या तीन दिवसात पूरग्रस्त भागात मंदिर, मस्जिद तसेच चिखलमय झालेल्या घरांच्या स्वच्छतेची मोहीम राबविली. ही सर्व घरे स्वच्छ करुन तेथील रहिवाशांना अन्नधान्याची मदतही केली. त्यानंतर आणखी एक ६० जणांचे पथक चिपळुणातील पूरग्रस्त भागात स्वच्छता करण्यासाठी रवाना झाले आहे. राजीवडावासीयांच्या या कामाबद्दल पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------------

समिती स्थापन

राजीवडा गावात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सलाऊद्दीन सुवर्णदुर्गकर, शब्बीर भाटकर, जावेद मस्तान, नजीर वाडकर, मुफ्ती समिऊल्ला, अल्ताफ बुड्ये, इमरान सोलकर, शौकत पावसकर, लुकमान कोतवडेकर, मौलाना मुनीर वस्ता, तौफीक वस्ता, हाफिज मुतलीब, शहजाद भाटकर, मुजीब पावसकर, नुमान गडकरी, तौहीद वस्ता आदींचा समावेश आहे. ही समिती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सतत कार्यरत आहे.