शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजीवडावासीयांकडून १५०० पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा ...

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावातील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून चिपळुणातील सुमारे १,५०० पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडे, पाणी आदींचा पुरवठा केला. तसेच मुरादपूर भागामध्ये सुमारे ४७ पूरग्रस्तांचे जीव वाचवले. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राजीवडा गावातील ६० तरुणांचे पथक आजही पूरग्रस्त भागात कार्यरत आहे.

चिपळुणात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राजीवडा गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या मदतीसाठी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नजीर वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन बोटी घेऊन भातगावमार्गे शब्बीर भाटकर, इमरान सोलकर, आसिफ वस्ता, कमरुद्दीन गडकरी, मुजाहीद तांडेल, सलमान जांभारकर, रशिद वस्ता, सनाऊल्ला गडकरी, शादाब तांडेल आणि रुहान गडकरी हे दर्यावर्दी पथक गेले होते. या लहान बोटी असल्यामुळे काहींनी या पथकाची चेष्टाही केली. मात्र, या पथकाने मुरादपूर परिसरात ४७ पूरग्रस्तांना मदत करुन वाचवले. त्यावेळी एका कारशेडच्या छप्परावर मगर होती. तरीही जीवाची पर्वा न करता या पथकाने मदतकार्य सुरुच ठेवले होते.

पूरग्रस्त भागात पथक कार्यरत असताना राजीवडावासीयांनी गावामध्ये फिरुन अन्नधान्य, पाणी बाटल्या, कपडे, बिस्कीटे आदी मदत गोळा करुन चिपळूणच्या दिशेने रवाना केली. आठवडाभर लोक मदतीसाठी धावाधाव करत होते. राजीवडा गावातून सुमारे २१ गाड्या घेऊन तरुण मंडळी चिपळुणात मदतकार्य करत होती. पेठमाप, गणेश मंदिर, मुरादपूर, खेर्डी, गोवळकोट व अन्य भागातील सुमारे १,५०० लोकांपर्यंत घरोघरी जाऊन मदत केली. सतत तीन दिवस ही मदत सुरु होती.

महापुरानंतर आता चिखल साफ करण्यासाठी राजीवडा गावातील मुफ्ती समिऊल्ला आणि अल्ताफ बुड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या ६० जणांच्या पथकाने गेल्या तीन दिवसात पूरग्रस्त भागात मंदिर, मस्जिद तसेच चिखलमय झालेल्या घरांच्या स्वच्छतेची मोहीम राबविली. ही सर्व घरे स्वच्छ करुन तेथील रहिवाशांना अन्नधान्याची मदतही केली. त्यानंतर आणखी एक ६० जणांचे पथक चिपळुणातील पूरग्रस्त भागात स्वच्छता करण्यासाठी रवाना झाले आहे. राजीवडावासीयांच्या या कामाबद्दल पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि पोलीस निरीक्षक सुरेश लाड यांनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------------

समिती स्थापन

राजीवडा गावात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सलाऊद्दीन सुवर्णदुर्गकर, शब्बीर भाटकर, जावेद मस्तान, नजीर वाडकर, मुफ्ती समिऊल्ला, अल्ताफ बुड्ये, इमरान सोलकर, शौकत पावसकर, लुकमान कोतवडेकर, मौलाना मुनीर वस्ता, तौफीक वस्ता, हाफिज मुतलीब, शहजाद भाटकर, मुजीब पावसकर, नुमान गडकरी, तौहीद वस्ता आदींचा समावेश आहे. ही समिती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सतत कार्यरत आहे.