शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता भासल्यास चिपळूणात हेलिकाॅप्टरद्वारे मदतकार्य करणार : अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू ...

रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. यात बाधित झालेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था सुरू आहे. पुरात अडकलेल्यांना फूड पॅकेट्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असल्यास हेलिकाॅप्टरची सोयही करण्यात आली आहे, हे निसर्गाचे संकट असल्याने लोकांना धीर देऊन, बचावकार्य करणे, मदत करणे यालाच सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत कोकण आयुक्त विलास पाटील, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री परब यांनी चिपळुणात २००५ सालापेक्षाही स्थिती भयंकर असल्याचे नमूद केले. कोळकेवाडी धरणात रात्री २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने या धरणाचा विसर्ग करणे अपरिहार्य होते. त्यामुळे पहाटे चिपळुणातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी खासगी ४ बोटी, कोस्ट गार्ड, पोलीस यांच्या प्रत्येकी एक आणि चिपळूण नगर परिषदेच्या दोन बोटी यांच्या माध्यमातून नागरिकांना हलविले जात आहे. एनडीआरएफचे २३, २३ जणांचे ग्रुप चिपळूण आणि खेड येथे मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमसोबतच स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून रोप आणि ट्यूब यांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले आहे. पूरबाधितांचे सावर्डे तसेच अन्य उंच ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूणप्रमाणेच खेडमध्येही एनडीआरएफ टीमसोबत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

रात्री चिपळुणातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पहाटेच ३ वाजता जिल्हा मुख्यालयातून ३० लोकांना पाठविण्यात आले, ते मदतकार्य करत आहेत. सकाळी साहित्य मुख्यालयातून पाठविण्यात आले आहे. तातडीने मदतकार्य सुरू असल्याने पुढील दोन तासात परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी दिली.