शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता भासल्यास चिपळूणात हेलिकाॅप्टरद्वारे मदतकार्य करणार : अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू ...

रत्नागिरी : अतिवृष्टी, भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग अशा तीनही गोष्टींमुळे चिपळुणात पाणी भरले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. यात बाधित झालेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था सुरू आहे. पुरात अडकलेल्यांना फूड पॅकेट्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असल्यास हेलिकाॅप्टरची सोयही करण्यात आली आहे, हे निसर्गाचे संकट असल्याने लोकांना धीर देऊन, बचावकार्य करणे, मदत करणे यालाच सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत कोकण आयुक्त विलास पाटील, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री परब यांनी चिपळुणात २००५ सालापेक्षाही स्थिती भयंकर असल्याचे नमूद केले. कोळकेवाडी धरणात रात्री २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने या धरणाचा विसर्ग करणे अपरिहार्य होते. त्यामुळे पहाटे चिपळुणातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी खासगी ४ बोटी, कोस्ट गार्ड, पोलीस यांच्या प्रत्येकी एक आणि चिपळूण नगर परिषदेच्या दोन बोटी यांच्या माध्यमातून नागरिकांना हलविले जात आहे. एनडीआरएफचे २३, २३ जणांचे ग्रुप चिपळूण आणि खेड येथे मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या टीमसोबतच स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून रोप आणि ट्यूब यांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले आहे. पूरबाधितांचे सावर्डे तसेच अन्य उंच ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूणप्रमाणेच खेडमध्येही एनडीआरएफ टीमसोबत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

रात्री चिपळुणातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पहाटेच ३ वाजता जिल्हा मुख्यालयातून ३० लोकांना पाठविण्यात आले, ते मदतकार्य करत आहेत. सकाळी साहित्य मुख्यालयातून पाठविण्यात आले आहे. तातडीने मदतकार्य सुरू असल्याने पुढील दोन तासात परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी दिली.