शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरूवात होत असून, रात्रभर पाऊस सुरू ...

रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरूवात होत असून, रात्रभर पाऊस सुरू राहात असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पडझडीला प्रारंभ झाला आहे. काही भागात पाणी भरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८८८.२० मिलिमीटर (९८.६९) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली असून, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १९३.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल संगमेश्वर (१२३.९० मिलिमीटर) आणि राजापूर तालुक्यात (११४.८० मिलिमीटर) पाऊस झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे दरड कोसळली. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर येथे रस्त्यावर झाडे कोसळल्याने रस्ता बंद होता. बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरु आहे.

रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथे शनिवारी स्वप्नाली कांबळे यांच्या घराशेजारी दरड कोसळली. या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. तसेच या गावात (टेंभ्ये पूल) येथे (एमएच ०८ एएफ ४२१६) ही दुचाकी वाहून गेली. लांजा - वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून, दरड हटविण्याचे काम सुरु आहे.

रविवारी रात्रीही पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झाले. दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा सायंकाळपासून जोरदार बरसण्यास सुरूवात केली.