शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन निर्णयानंतरही मुख्याध्यापक बदलीचा गोंधळ

By admin | Updated: July 10, 2016 01:46 IST

कृतीशून्य भूमिका : जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ

शिरगाव : रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक बदलीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने निकालही दिला. आदेश असतानाही मुख्याध्यापकांचे बदलीबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यांचे समुपदेशन हे २०१५-१६चे द्वितीय सत्रातच होणे गरजेचे होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने कृतीशून्य भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात ५ जूनपूर्वीच बदल्यांची प्रक्रिया पार पडली. २०१४ साली आरटीईच्या नियमानुसार उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक नेमणुका पार पडल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०१४ पासून ७२ शाळांमध्ये दोन मुख्याध्यापक देऊन वेगळा पायंडा पाडला आहे. निकषानुसार नवीन मुख्याध्यापक नियुक्तीनंतर जुन्या मुख्याध्यापकांनी पदभार सोडलेला नाही. यामुळे अनेक शाळेत जुना-नवा वाद निर्माण झाले आहेत. शिक्षकीपेशा प्रामाणिकपणे जपणाऱ्या सर्वांसाठीच ही गोंधळाची स्थिती असून, शिक्षक संघटनाही याबाबत गप्प असल्याने चिपळूण तालुक्यातील शिक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. २०१४ साली झालेले समुपदेशन चुकीचे ठरत असेल तर त्याबाबतच्या कार्यवाहीला दोन वर्ष का लागत आहेत? शालेय प्रशासन सांभाळणारा मुख्याध्यापक पदवीधर असावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत संघटना गप्प का? शिक्षक पदवीधर व मुख्याध्यापक दहावी शिकलेला हे चित्र बदलणे गरजेचे आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकाने प्रशासकीय, विनंती बदल्यांमध्ये अपेक्षाभंगच सहन करायचा? आपले कुटुंबही कधी शहरात यावे, असे त्यांनी विचारातही आणायचे नाही का? असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात खदखदत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित व बहुचर्चित अशा मुख्याध्यापकांबाबतच्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ उपशिक्षकाला बाजूला करुन पात्र नसलेले मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत ठेवले जाणार असल्याने याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)