शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

न्यायालयीन निर्णयानंतरही मुख्याध्यापक बदलीचा गोंधळ

By admin | Updated: July 10, 2016 01:46 IST

कृतीशून्य भूमिका : जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ

शिरगाव : रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक बदलीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने निकालही दिला. आदेश असतानाही मुख्याध्यापकांचे बदलीबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यांचे समुपदेशन हे २०१५-१६चे द्वितीय सत्रातच होणे गरजेचे होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने कृतीशून्य भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील ७२ शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात ५ जूनपूर्वीच बदल्यांची प्रक्रिया पार पडली. २०१४ साली आरटीईच्या नियमानुसार उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक नेमणुका पार पडल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेने २०१४ पासून ७२ शाळांमध्ये दोन मुख्याध्यापक देऊन वेगळा पायंडा पाडला आहे. निकषानुसार नवीन मुख्याध्यापक नियुक्तीनंतर जुन्या मुख्याध्यापकांनी पदभार सोडलेला नाही. यामुळे अनेक शाळेत जुना-नवा वाद निर्माण झाले आहेत. शिक्षकीपेशा प्रामाणिकपणे जपणाऱ्या सर्वांसाठीच ही गोंधळाची स्थिती असून, शिक्षक संघटनाही याबाबत गप्प असल्याने चिपळूण तालुक्यातील शिक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. २०१४ साली झालेले समुपदेशन चुकीचे ठरत असेल तर त्याबाबतच्या कार्यवाहीला दोन वर्ष का लागत आहेत? शालेय प्रशासन सांभाळणारा मुख्याध्यापक पदवीधर असावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत संघटना गप्प का? शिक्षक पदवीधर व मुख्याध्यापक दहावी शिकलेला हे चित्र बदलणे गरजेचे आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकाने प्रशासकीय, विनंती बदल्यांमध्ये अपेक्षाभंगच सहन करायचा? आपले कुटुंबही कधी शहरात यावे, असे त्यांनी विचारातही आणायचे नाही का? असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात खदखदत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित व बहुचर्चित अशा मुख्याध्यापकांबाबतच्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ उपशिक्षकाला बाजूला करुन पात्र नसलेले मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत ठेवले जाणार असल्याने याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)