शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गाळाने भरल्या दीड हजार विहिरी

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

टंचाईवर उपाय : केवळ १० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : गाळाने भरलेल्या १०४२ विहिरींतील गाळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपसा करण्यात येतात. मात्र, चालू आर्थिक वर्षात या विहिरींची १० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. विहिरींचा गाळ उपसा झाल्यास जिल्ह्यात उद्भवणारा पाणीटंचाईचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ जिल्ह्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ या टंचाईच्या कालावधीत विहिरींचा ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होतो़ जिल्ह्यात विहिरींमधील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे या विहिरीतील झरे बंद झाले आहेत़ भविष्यात या विहिरी गाळाने बुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ त्यासाठी या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींमधील वाड्यांमध्ये १०४२ विहिरींतील गाळ उपसण्याच्या कामांचे आराखड्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हा आराखडा मंजूरही करण्यात आला होता.ही कामे येत्या आर्थिक वर्षात सुरु करण्यात येणार होती. या कामामुळे लाखो लोकांच्या हातांना काम मिळणार आहे़ मात्र, या उद्दिष्टांपैकी १० टक्केही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही.मजुरांची जिल्ह्यात वानवा आहेच. ही कामे सुरु झाल्यास परिणाम चांगले जाणवतील. कारण पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. त्यासाठी सर्वच कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. मात्र, मजुरांअभावी ते शक्य नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. (शहर वार्ताहर)