शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

गाळाने भरल्या दीड हजार विहिरी

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

टंचाईवर उपाय : केवळ १० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : गाळाने भरलेल्या १०४२ विहिरींतील गाळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपसा करण्यात येतात. मात्र, चालू आर्थिक वर्षात या विहिरींची १० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. विहिरींचा गाळ उपसा झाल्यास जिल्ह्यात उद्भवणारा पाणीटंचाईचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ जिल्ह्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ या टंचाईच्या कालावधीत विहिरींचा ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होतो़ जिल्ह्यात विहिरींमधील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे या विहिरीतील झरे बंद झाले आहेत़ भविष्यात या विहिरी गाळाने बुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ त्यासाठी या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींमधील वाड्यांमध्ये १०४२ विहिरींतील गाळ उपसण्याच्या कामांचे आराखड्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हा आराखडा मंजूरही करण्यात आला होता.ही कामे येत्या आर्थिक वर्षात सुरु करण्यात येणार होती. या कामामुळे लाखो लोकांच्या हातांना काम मिळणार आहे़ मात्र, या उद्दिष्टांपैकी १० टक्केही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही.मजुरांची जिल्ह्यात वानवा आहेच. ही कामे सुरु झाल्यास परिणाम चांगले जाणवतील. कारण पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. त्यासाठी सर्वच कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. मात्र, मजुरांअभावी ते शक्य नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. (शहर वार्ताहर)