शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

गाळाने भरल्या दीड हजार विहिरी

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

टंचाईवर उपाय : केवळ १० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : गाळाने भरलेल्या १०४२ विहिरींतील गाळ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपसा करण्यात येतात. मात्र, चालू आर्थिक वर्षात या विहिरींची १० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. विहिरींचा गाळ उपसा झाल्यास जिल्ह्यात उद्भवणारा पाणीटंचाईचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ जिल्ह्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ या टंचाईच्या कालावधीत विहिरींचा ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होतो़ जिल्ह्यात विहिरींमधील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे या विहिरीतील झरे बंद झाले आहेत़ भविष्यात या विहिरी गाळाने बुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ त्यासाठी या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींमधील वाड्यांमध्ये १०४२ विहिरींतील गाळ उपसण्याच्या कामांचे आराखड्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये ४ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हा आराखडा मंजूरही करण्यात आला होता.ही कामे येत्या आर्थिक वर्षात सुरु करण्यात येणार होती. या कामामुळे लाखो लोकांच्या हातांना काम मिळणार आहे़ मात्र, या उद्दिष्टांपैकी १० टक्केही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही.मजुरांची जिल्ह्यात वानवा आहेच. ही कामे सुरु झाल्यास परिणाम चांगले जाणवतील. कारण पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. त्यासाठी सर्वच कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. मात्र, मजुरांअभावी ते शक्य नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. (शहर वार्ताहर)