शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची तीव्र औषधे आणि ‘प्रोटिनलाॅस’मुळे केस गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवतोच. पण कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी तीव्र औषधे आणि प्रामुख्याने प्रथिनांसह अन्य जीवनसत्त्वांची होणारी हानी यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना केस गळण्याची समस्या सुरू होते.

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना रुग्णामधील विविध जीवनसत्त्वांची हानी होते. त्यातच कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करतो. त्याच्यासाठी दीर्घकालीन उपाय घ्यावे लागतात. काही औषधे तीव्र स्वरूपाची असतात. ती दीर्घकाळ घ्यावी लागल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम शरीराच्या इतर भागावर होतात. कोरोनाबाधित झालेल्या अनेक रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही या औषधांच्या माऱ्यामुळे अनेक त्रास होतात. कोरोनाशी लढा देताना शरीरातील विविध जीवनसत्त्वांचा नाश होतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते. विशेषत: प्रथिनांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना केस गळणे, थकवा जाणवणे आदी त्रास होतात. यासाठी अधिक प्रथिने मिळतील असा आहार, भरपूर विश्रांती आणि भरपूर पाणी याची गरज आहे.

तीन महिन्यानंतर गळतात केस

कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध जीवनसत्त्वांची हानी होत असल्याने तीन महिन्यानंतर काहींचे केस गळण्यास सुरुवात होते. प्रथिनांच्या ऱ्हासामुळे ही समस्या अधिक होते. त्यामुळे ही जीवनसत्त्वे नैसर्गिक घेतली तर उत्तम. पण अधिक प्रमाणात मिळण्यासाठी गोळ्या किंवा पावडरचा वापर करावा लागतो.

...................

हे करा...

शरीराला आलेला थकवा दूर होण्यासाठी परिपूर्ण आहाराची गरज.

प्रथिनयुक्त आहाराचा अधिकाधिक समावेश करावा.

आहारात अंडी, मोड आलेली कडधान्ये, साेयाबीन, दूध यांचा समावेश असावा.

क, ड आदी जीवनसत्त्वे मिळणेही गरजेचे असते. त्यादृष्टीने आहार घ्यावा.

कोरोनानंतरही खूप थकवा जाणवतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी.

शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे

........................

आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोनातून बरे झाल्यानंतर कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण घटते.

- कोरोनानंतर काही रुग्णांना यामुळे विलक्षण थकवा जाणवणे, श्वसनात अडसर, खाेकला आदी त्रास होत राहतात.

- काही जणांचे केस प्रथिने घटल्याने गळू लागतात. त्यामुळे काही जण तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- परंतु हे उपचारच काही वेळा घातक ठरतात. त्यामुळे या उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कोट

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना शरीरातील पोषक जीवनसत्त्वांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर परिपूर्ण आहार घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. तसेच भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घ्यावी.

- डाॅ. ज्ञानेश विटेकर, शल्य चिकित्सक, रत्नागिरी