शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

गुहागर तालुका : ‘गृह’ आहे पण ‘स्वच्छता’ नाही

By admin | Updated: September 20, 2014 00:22 IST

शाळांमधील परिस्थिती बनलेय चिंताजनक

मंदार गोयथळे - असगोली -शिक्षकदिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रम देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याच अनुषंगाने गुहागर तालुक्याचा आढावा घेतला असता जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर खासगी शाळा व माध्यमिक विद्यालयात स्वच्छतागृहे असल्याचे निदर्शनास आले. परंतु अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची स्वच्छता हीच चिंतेची बाब असल्याचेही समोर आले आहे.गुहागर तालुक्यात एकूण २४४ शाळा आहेत. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत १२५ शाळा, पहिली ते सातवीपर्यंत ८५, माध्यमिक विद्यालय २७ व खाजगी प्राथमिक शाळा ७ यांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यामधील सर्वच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. परंतु अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, पुरेसे पाणी उपलब्ध नाही. अनेक स्वच्छतागृहांमध्ये पुरेसा प्रकाश नाही. स्वच्छतागृहांसाठी टाकीची व्यवस्था नसल्यसाने येणारी दुर्गंधी अशा विविध समस्या आहेत. या समस्या सोडवण्याचा विचार शाळा व्यवस्थापन समिती वा शिक्षक विचार करत नसल्याने प्रश्न जैसे थे आहेत.जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी परिचर कोठून आणणार, साफसफाईसाठी लागणारे फिनेल, पावडर इत्यादी साहित्य कोणत्या खर्चातून आणायचे असे प्रश्न शिक्षकांसमोर आहेत. सर्व शिक्षा अभियानातून शाळा देखभाल अनुदान मिळते परंतु ते इतके तुटपुंजे असते की त्यामधून इतर खर्चांनाच पैसे कमी पडतात. शाळांमधील पाण्याची व्यवस्थाही गावातील नळपाणी योजनेच्या माध्यमातून केली आहे. परंतु अनेक ठिकाणी साठवण टाकीत पाणी चढत नाही. पुरेसे पाणी येत नाही. अशा समस्या आहेत. रोजच्या वापराचे पाणी शिक्षक आणि विद्यार्थी भरुन ठेवतात. पण स्वच्छतागृहासाठी जास्तपाणी आवश्यक असते. ते कोठून आणणार? असा प्रश्न शाळांना पडला आहे.माध्यमिक शाळांमध्ये तुलनेने बरी स्थिती आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने स्वच्छतागृहांची सफाई करणे अनिवार्यच ठरते. शिवाय निधी आणि परिचर यांची उपलब्धता असल्याने साफसफाईकडे लक्ष पुरवले जाते. याबाबत गुहागरचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानाचा फायदा सर्व शाळांना झाला आहे. यातूनच गुहागर तालुक्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे उभी राहिली आहे.भारत सरकार आणि युनिसेफ यांच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक विकास निर्देशांक निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक गरजांची उपलब्धता ही तपासली जाते. गुहागर तालुक्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट निर्देशांक मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यावरुनच गुहागर तालुक्याचा शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती भौतिक सुविधांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची काळजी घेतो हे स्पष्ट होते.