शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळणार : जमीर खलिफे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहेच; पण त्याहीपेक्षा ...

राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहेच; पण त्याहीपेक्षा कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे कोलमडलेल्या तालुका, जिल्हा, राज्य आणि देशांच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता या प्रकल्पाला आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करीत तसा ठराव मंगळवारी पारित केल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यात ज्या ठिकाणी हा प्रकल्प होईल तिथल्या जनतेच्या शंकांचे समाधान करून व स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच तो व्हावा अशी भूमिकाही ॲड. खलिफे यांनी मांडली. मंगळवारी राजापूर नगर परिषदेने रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव करण्यात आला. रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेस पक्षाने यापूर्वीच समर्थन दर्शविले आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनीही प्रकल्पाचे समर्थन करत तसे ठराव पारित केले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने देखील या प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेत आपला पाठिंबा दर्शविला आहे. चांगल्या आरोग्य, शैक्षणिक सुविधा आणि बेरोजगारी मिटणार असेल आमच्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार असेल तर असे प्रकल्प आलेच पाहिजेत आणि त्याचे स्वागत झाले पाहिजे, अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडली.

आज कोरोना संकटात आरोग्य सुविधेची किती आणि कशी वानवा आहे हे आपण सगळेजण पाहत आहोत. शासन आपल्या परीने करत आहे; मात्र ते पुरे पडू शकत नाही. अशा काळात रिफायनरी कंपनीनेही तालुक्यात आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ही चांगली सुरुवात आहे. भविष्यात जर या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात चांगली, सक्षम आरोग्य सेवा निर्माण होणार असेल आणि त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळणार असेल तर भविष्यासाठी एक चांगलेच असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याच्या आणि शहराच्या विकासाला गती मिळावी अशी आपली भूमिका असून त्यासाठीच आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वेळप्रसंगी मतभेद, राजकीय उणीदुणी बाजूला सारून अशा विकासात्मक कामासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. स्थानिक जनतेला जर हा प्रकल्प हवा असेल, त्यांचे समाधान होणार असेल तर त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे अशीही आमची भूमिका आहे.

कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये कोरोनाकाळात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितच राज्य आणि देशपातळीवर हा प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल याची आपणाला खात्री असल्याचे नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी सांगितले़ भविष्यातील विकासासाठी हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले.