शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंधनाशिवाय ग्रीन एनर्जी निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:23 IST

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी ...

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी प्रॉडक्शन) प्रयोग जाकीमिऱ्या येथील विनायक बंडबे यांनी यशस्वी करून दाखविला आहे. सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रायोगिक प्रकल्पातून ५ हजार वॅट (५ किलोवॅट) ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिकही बंडबे यांनी रविवारी पत्रकारांसमोर सादर केले. या प्रकल्प संशोधनाचे पेटंट मिळावे म्हणून बंडबे यांनी शासनाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे.गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रायोगिक प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारल्यास त्यातून स्वस्त व प्रदूषणमुक्त वीज निर्मितीबरोबरच हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे बंडबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशा प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांना भागिदारीद्वारे मालकही होता येईल, असेही त्यांनी सांगितले.जाकीमिºया येथे सध्या उभारलेला प्रायोगिक प्रकल्प हा लहान स्वरुपातील असून, या प्रकारे १५ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही उभारता येईल. त्यासाठी ७ कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. तसेच त्यामध्ये २०० लोकांना रोजगार मिळू शकेल. अशा १५ मेगावॅट प्रकल्पाची उभारणी इतर प्रकारे केल्यास त्यासाठी ९० ते २७० कोटीपर्यंत खर्च येऊ शकेल.स्लोपिंग ट्रॅक आणि रोलर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पासाठी ४० ते ५० लाख रुपये खर्च येईल. इतर प्रकारे १ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ५ ते ७ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहितीही बंडबे यांनी दिली.सध्या शासकीय स्तरावरील वीज महामंडळाची वीज प्रतियुनिट ७ रुपये दराने उपलब्ध होते. मात्र स्लोपिंग तंत्रज्ञानाद्वारे उत्पादीत केलेली वीज ही प्रतियुनिट २ रुपयेने उपलब्ध होऊ शकते. स्लोपिंग तंत्राद्वारे वीज निर्मितीच्या या प्रकल्प उभारणीत भारती शिपयार्डचे अभियंता गॉडविन नरोन्हा, सुधीर वासावे व संतोष पावरी यांची मदत बंडबे यांना लाभली आहे.हजारोंना रोजगार१५ मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी १० गुंठे जागा लागेल व त्याद्वारे ४ ते ५ गावांना वीज पुरवठा करता येईल, असेही बंडबे यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये ८ तास काम करणाºयांना प्रत्यक्षात ८ तासातील २ तासच काम करावे लागणार आहे. इंधन न वापरता वीज निर्मिती करणारे प्रकल्प भारतभर उभारले गेल्यास त्यातून हजारो बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही इंधनाव्यतिरिक्त वीजनिर्मिती होण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बंडबे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना यासाठी आता भक्कमपणे पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.