शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंधनाशिवाय ग्रीन एनर्जी निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:23 IST

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी ...

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी प्रॉडक्शन) प्रयोग जाकीमिऱ्या येथील विनायक बंडबे यांनी यशस्वी करून दाखविला आहे. सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रायोगिक प्रकल्पातून ५ हजार वॅट (५ किलोवॅट) ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिकही बंडबे यांनी रविवारी पत्रकारांसमोर सादर केले. या प्रकल्प संशोधनाचे पेटंट मिळावे म्हणून बंडबे यांनी शासनाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे.गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रायोगिक प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारल्यास त्यातून स्वस्त व प्रदूषणमुक्त वीज निर्मितीबरोबरच हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे बंडबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशा प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांना भागिदारीद्वारे मालकही होता येईल, असेही त्यांनी सांगितले.जाकीमिºया येथे सध्या उभारलेला प्रायोगिक प्रकल्प हा लहान स्वरुपातील असून, या प्रकारे १५ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही उभारता येईल. त्यासाठी ७ कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. तसेच त्यामध्ये २०० लोकांना रोजगार मिळू शकेल. अशा १५ मेगावॅट प्रकल्पाची उभारणी इतर प्रकारे केल्यास त्यासाठी ९० ते २७० कोटीपर्यंत खर्च येऊ शकेल.स्लोपिंग ट्रॅक आणि रोलर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पासाठी ४० ते ५० लाख रुपये खर्च येईल. इतर प्रकारे १ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ५ ते ७ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहितीही बंडबे यांनी दिली.सध्या शासकीय स्तरावरील वीज महामंडळाची वीज प्रतियुनिट ७ रुपये दराने उपलब्ध होते. मात्र स्लोपिंग तंत्रज्ञानाद्वारे उत्पादीत केलेली वीज ही प्रतियुनिट २ रुपयेने उपलब्ध होऊ शकते. स्लोपिंग तंत्राद्वारे वीज निर्मितीच्या या प्रकल्प उभारणीत भारती शिपयार्डचे अभियंता गॉडविन नरोन्हा, सुधीर वासावे व संतोष पावरी यांची मदत बंडबे यांना लाभली आहे.हजारोंना रोजगार१५ मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी १० गुंठे जागा लागेल व त्याद्वारे ४ ते ५ गावांना वीज पुरवठा करता येईल, असेही बंडबे यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये ८ तास काम करणाºयांना प्रत्यक्षात ८ तासातील २ तासच काम करावे लागणार आहे. इंधन न वापरता वीज निर्मिती करणारे प्रकल्प भारतभर उभारले गेल्यास त्यातून हजारो बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही इंधनाव्यतिरिक्त वीजनिर्मिती होण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बंडबे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना यासाठी आता भक्कमपणे पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.