शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा ...

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा व असणाऱ्या समस्या समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे होते, मात्र, तसे झाले नसल्याचे ग्राम संवाद सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप आर्यमाने यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे़.

आपला जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील ग्रामकृती दल व ग्रामपंचायत यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर निर्णय घेता आला, तरच आरोग्य विभागावरील येणारा ताण कमी होईल. प्रत्येक गाव कोरोना मुक्त होईल परिणामी आपला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांना देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन होत आहेच, परंतु कर्तव्यांसोबत अधिकारही तितकेच देणे गरजेचे आहेत. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती ही त्या-त्या ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांनाच माहिती असते. आवश्यकता भासल्यास गावाच्या सीमा बंद करणे, बाजारपेठा सुरू ठेवणे-बंद ठेवणे, वाहतूक नियंत्रित ठेवणे अशाप्रकारचे अधिकार तसेच गाव कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने सर्व ते अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रथम पहिला डोस देऊन प्रत्येक गाव पूर्ण होणे गरजेचे आहे. मगच दुसरा डोस देणे योग्य ठरेल. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्पर्धा जिंकणे या हेतूपेक्षा प्रत्येक गाव कोरोनामुक्त करणे हा हेतू आहे. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीकडून योग्यप्रकारे काम केले गेले आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ यामध्ये कामकाज करण्यासाठी व प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अधिकार द्यावेत, जेणेकरून आपला जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी मागणी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.