शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा ...

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा व असणाऱ्या समस्या समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे होते, मात्र, तसे झाले नसल्याचे ग्राम संवाद सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप आर्यमाने यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे़.

आपला जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील ग्रामकृती दल व ग्रामपंचायत यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर निर्णय घेता आला, तरच आरोग्य विभागावरील येणारा ताण कमी होईल. प्रत्येक गाव कोरोना मुक्त होईल परिणामी आपला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांना देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन होत आहेच, परंतु कर्तव्यांसोबत अधिकारही तितकेच देणे गरजेचे आहेत. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती ही त्या-त्या ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांनाच माहिती असते. आवश्यकता भासल्यास गावाच्या सीमा बंद करणे, बाजारपेठा सुरू ठेवणे-बंद ठेवणे, वाहतूक नियंत्रित ठेवणे अशाप्रकारचे अधिकार तसेच गाव कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने सर्व ते अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रथम पहिला डोस देऊन प्रत्येक गाव पूर्ण होणे गरजेचे आहे. मगच दुसरा डोस देणे योग्य ठरेल. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्पर्धा जिंकणे या हेतूपेक्षा प्रत्येक गाव कोरोनामुक्त करणे हा हेतू आहे. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीकडून योग्यप्रकारे काम केले गेले आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ यामध्ये कामकाज करण्यासाठी व प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अधिकार द्यावेत, जेणेकरून आपला जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी मागणी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.