शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा ...

आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा व असणाऱ्या समस्या समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे होते, मात्र, तसे झाले नसल्याचे ग्राम संवाद सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप आर्यमाने यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे़.

आपला जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील ग्रामकृती दल व ग्रामपंचायत यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर निर्णय घेता आला, तरच आरोग्य विभागावरील येणारा ताण कमी होईल. प्रत्येक गाव कोरोना मुक्त होईल परिणामी आपला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांना देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन होत आहेच, परंतु कर्तव्यांसोबत अधिकारही तितकेच देणे गरजेचे आहेत. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती ही त्या-त्या ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांनाच माहिती असते. आवश्यकता भासल्यास गावाच्या सीमा बंद करणे, बाजारपेठा सुरू ठेवणे-बंद ठेवणे, वाहतूक नियंत्रित ठेवणे अशाप्रकारचे अधिकार तसेच गाव कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने सर्व ते अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रथम पहिला डोस देऊन प्रत्येक गाव पूर्ण होणे गरजेचे आहे. मगच दुसरा डोस देणे योग्य ठरेल. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्पर्धा जिंकणे या हेतूपेक्षा प्रत्येक गाव कोरोनामुक्त करणे हा हेतू आहे. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीकडून योग्यप्रकारे काम केले गेले आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ यामध्ये कामकाज करण्यासाठी व प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अधिकार द्यावेत, जेणेकरून आपला जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी मागणी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.