शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी पालकांशी चर्चा करून ठराव करण्याचे सूचित केले आहे. मात्र, पालकांमध्येच संभ्रम असल्याने अद्याप तरी जिल्ह्यातील एकही शाळेने ठराव केलेला नसला तरी पालकांकडून सूचना मात्र मागविल्या आहेत.

नववी व अकरावी हा दहावी व बारावीचा पाया असल्याने या वर्गातील मुलांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही अट महत्त्वपूर्ण असून, शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिवाय कोरोनाबाबतच्या शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नसलेल्या गावांतून शाळा सुरू होऊ शकत असल्या तरी पालकांमध्ये मात्र अद्याप भीतीसह, संभ्रमच आहे.

शासनाच्या अध्यादेशाबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांनीही पालकांच्या व्हाॅटस्अप ग्रुपवर सूचना पाठविल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातून शासनाच्या सूचनेनुसार समिती गठित करून शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा ठराव मंजूर करणे गरजेचे असून, तो ठराव शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करायचा आहे. मात्र, अद्याप एकाही गावाने तसा ठराव केलेला नाही.

शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोना नसलेल्या गावांतून सुरू करण्याचा अध्यादेश जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी समितीने चर्चेतून निर्णय घ्यायचा आहे. शिवाय शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, सध्या पावसाळा असून, साथीचे आजार या काळातच जास्त बळावतात. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे दीपावलीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू करण्याची तूर्तास तरी शासनाने घाई करू नये.

- कविता वाघ, पालक, रत्नागिरी

कोरोनासंबंधी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे जिल्ह्यातील ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या गावांत शाळा सुरू होऊ शकतात. परंतु, त्यासाठीही शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असून, त्यांचे पालनही करणे गरजेचे आहे. शासन मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी विचार करत असले तरी या निर्णयाची अमलबजावणी पावसाळ्यानंतरच व्हावी. काही शिक्षक संबंधित गावात राहत नाहीत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेही कोरोना नसलेल्या गावात त्याचा शिरकाव होण्याचा धोका आहे.

- वेदांत पाटील, पालक, संगमेश्वर

ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या सूचनेनुसार महत्त्वपूर्ण मंडळींची समिती गठित करून त्यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचनांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. सर्वानुमते निर्णय घेत तसा ठराव मंजूर करून पाठवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही योग्य खबरदारी आवश्यक आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

n गावात किमान एक महिना कोरोना रूग्ण आढळून आलेला नसावा.

n शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे.

n गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

n विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंदचा निर्णय घेण्यात यावा.

n मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे.

n कोरोनाबाबत शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक.