शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी पालकांशी चर्चा करून ठराव करण्याचे सूचित केले आहे. मात्र, पालकांमध्येच संभ्रम असल्याने अद्याप तरी जिल्ह्यातील एकही शाळेने ठराव केलेला नसला तरी पालकांकडून सूचना मात्र मागविल्या आहेत.

नववी व अकरावी हा दहावी व बारावीचा पाया असल्याने या वर्गातील मुलांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही अट महत्त्वपूर्ण असून, शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिवाय कोरोनाबाबतच्या शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नसलेल्या गावांतून शाळा सुरू होऊ शकत असल्या तरी पालकांमध्ये मात्र अद्याप भीतीसह, संभ्रमच आहे.

शासनाच्या अध्यादेशाबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांनीही पालकांच्या व्हाॅटस्अप ग्रुपवर सूचना पाठविल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातून शासनाच्या सूचनेनुसार समिती गठित करून शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा ठराव मंजूर करणे गरजेचे असून, तो ठराव शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करायचा आहे. मात्र, अद्याप एकाही गावाने तसा ठराव केलेला नाही.

शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोना नसलेल्या गावांतून सुरू करण्याचा अध्यादेश जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी समितीने चर्चेतून निर्णय घ्यायचा आहे. शिवाय शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, सध्या पावसाळा असून, साथीचे आजार या काळातच जास्त बळावतात. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे दीपावलीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू करण्याची तूर्तास तरी शासनाने घाई करू नये.

- कविता वाघ, पालक, रत्नागिरी

कोरोनासंबंधी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे जिल्ह्यातील ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या गावांत शाळा सुरू होऊ शकतात. परंतु, त्यासाठीही शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असून, त्यांचे पालनही करणे गरजेचे आहे. शासन मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी विचार करत असले तरी या निर्णयाची अमलबजावणी पावसाळ्यानंतरच व्हावी. काही शिक्षक संबंधित गावात राहत नाहीत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेही कोरोना नसलेल्या गावात त्याचा शिरकाव होण्याचा धोका आहे.

- वेदांत पाटील, पालक, संगमेश्वर

ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या सूचनेनुसार महत्त्वपूर्ण मंडळींची समिती गठित करून त्यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचनांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. सर्वानुमते निर्णय घेत तसा ठराव मंजूर करून पाठवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही योग्य खबरदारी आवश्यक आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

n गावात किमान एक महिना कोरोना रूग्ण आढळून आलेला नसावा.

n शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे.

n गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

n विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंदचा निर्णय घेण्यात यावा.

n मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे.

n कोरोनाबाबत शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक.