शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

पाचल विभाग : स्वच्छता मोहीम राबतेय फक्त अभियानापुरतीच

पाचल : पाचल विभागातील निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आपला दर्जा टिकविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ व सुंदर गाव अभिनव कल्पना वापरुन संपूर्ण भारत स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले गेले. ज्या ग्रामपंचायतीने या अभियानात भाग घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर केला, त्या ग्रामपंचायतीना शासनाच्यावतीने निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान राबवताना अटी व शर्ती घालून स्वच्छता अभियानाची नियमावली तयार करण्यात आली होती. यास बांधील राहून ग्रामपंचायत आपल्या परीने कामकाज करत होती. सर्वप्रथम हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून जिथे कुटुंब तिथे शौचालय बांधून त्याचा वापर नियमीत करावा. घर, घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवताना इतरही परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करुन गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. गावात असलेले पाणवठे, सार्वजनिक विहिरी तसेच वैयक्तीक विहिरी, जलशुद्धीकरण करुन आरोग्याच्या हितावह पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु हेच सातत्य राखण्यास ग्रामपंचायती अपयशी ठरल्याचे दिसून येते.राजापूर तालुक्यात आजही हजारो कुटुंब शौचालयाविना असून, तशी दप्तरी नोंद दिसून येते. काही कुटुंब शौचालय असूनसुद्धा उघड्यावर बसलेली दिसतात. हगणदारी मुक्ती करत असताना उघड्यावर शौचाला बसणे कायद्याने गुन्हा ठरविला असून, अशी कोणीही व्यक्ती दिसली तर दंड करुन दाखवणाऱ्यास बक्षीस म्हणून दिली जाते. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दंड केलेली व्यक्ती दिसून येत नाही. परंतु शौचाची दुर्गंधी मात्र परिसरात आढळून येते, तर काही ग्रामपंचायतींचे आवारही स्वच्छ दिसत नाहीत. ग्रामस्वच्छता अभियानाचे क्षणिक सुख घेऊन त्याकडे नंतर ग्रामपंचायतीनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे तालुक्यातील संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. निर्मल ग्रामपुरस्कारासाठी जसे काम झाले तसे काम सतत त्या भागात व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)