शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

पाचल विभाग : स्वच्छता मोहीम राबतेय फक्त अभियानापुरतीच

पाचल : पाचल विभागातील निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आपला दर्जा टिकविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ व सुंदर गाव अभिनव कल्पना वापरुन संपूर्ण भारत स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले गेले. ज्या ग्रामपंचायतीने या अभियानात भाग घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर केला, त्या ग्रामपंचायतीना शासनाच्यावतीने निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान राबवताना अटी व शर्ती घालून स्वच्छता अभियानाची नियमावली तयार करण्यात आली होती. यास बांधील राहून ग्रामपंचायत आपल्या परीने कामकाज करत होती. सर्वप्रथम हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून जिथे कुटुंब तिथे शौचालय बांधून त्याचा वापर नियमीत करावा. घर, घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवताना इतरही परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करुन गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. गावात असलेले पाणवठे, सार्वजनिक विहिरी तसेच वैयक्तीक विहिरी, जलशुद्धीकरण करुन आरोग्याच्या हितावह पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु हेच सातत्य राखण्यास ग्रामपंचायती अपयशी ठरल्याचे दिसून येते.राजापूर तालुक्यात आजही हजारो कुटुंब शौचालयाविना असून, तशी दप्तरी नोंद दिसून येते. काही कुटुंब शौचालय असूनसुद्धा उघड्यावर बसलेली दिसतात. हगणदारी मुक्ती करत असताना उघड्यावर शौचाला बसणे कायद्याने गुन्हा ठरविला असून, अशी कोणीही व्यक्ती दिसली तर दंड करुन दाखवणाऱ्यास बक्षीस म्हणून दिली जाते. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दंड केलेली व्यक्ती दिसून येत नाही. परंतु शौचाची दुर्गंधी मात्र परिसरात आढळून येते, तर काही ग्रामपंचायतींचे आवारही स्वच्छ दिसत नाहीत. ग्रामस्वच्छता अभियानाचे क्षणिक सुख घेऊन त्याकडे नंतर ग्रामपंचायतीनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे तालुक्यातील संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. निर्मल ग्रामपुरस्कारासाठी जसे काम झाले तसे काम सतत त्या भागात व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)