शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

दर्जा टिकवण्यात ग्रामपंचायती अपयशी

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

पाचल विभाग : स्वच्छता मोहीम राबतेय फक्त अभियानापुरतीच

पाचल : पाचल विभागातील निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आपला दर्जा टिकविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ व सुंदर गाव अभिनव कल्पना वापरुन संपूर्ण भारत स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवले गेले. ज्या ग्रामपंचायतीने या अभियानात भाग घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर केला, त्या ग्रामपंचायतीना शासनाच्यावतीने निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान राबवताना अटी व शर्ती घालून स्वच्छता अभियानाची नियमावली तयार करण्यात आली होती. यास बांधील राहून ग्रामपंचायत आपल्या परीने कामकाज करत होती. सर्वप्रथम हगणदारी मुक्त गाव व्हावा म्हणून जिथे कुटुंब तिथे शौचालय बांधून त्याचा वापर नियमीत करावा. घर, घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवताना इतरही परिसर स्वच्छ ठेवण्यास ग्रामस्थांना प्रवृत्त करुन गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. गावात असलेले पाणवठे, सार्वजनिक विहिरी तसेच वैयक्तीक विहिरी, जलशुद्धीकरण करुन आरोग्याच्या हितावह पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु हेच सातत्य राखण्यास ग्रामपंचायती अपयशी ठरल्याचे दिसून येते.राजापूर तालुक्यात आजही हजारो कुटुंब शौचालयाविना असून, तशी दप्तरी नोंद दिसून येते. काही कुटुंब शौचालय असूनसुद्धा उघड्यावर बसलेली दिसतात. हगणदारी मुक्ती करत असताना उघड्यावर शौचाला बसणे कायद्याने गुन्हा ठरविला असून, अशी कोणीही व्यक्ती दिसली तर दंड करुन दाखवणाऱ्यास बक्षीस म्हणून दिली जाते. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दंड केलेली व्यक्ती दिसून येत नाही. परंतु शौचाची दुर्गंधी मात्र परिसरात आढळून येते, तर काही ग्रामपंचायतींचे आवारही स्वच्छ दिसत नाहीत. ग्रामस्वच्छता अभियानाचे क्षणिक सुख घेऊन त्याकडे नंतर ग्रामपंचायतीनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे तालुक्यातील संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. निर्मल ग्रामपुरस्कारासाठी जसे काम झाले तसे काम सतत त्या भागात व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)