शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

धोकादायक बनल्या ग्रामपंचायती इमारती मोडकळीस

By admin | Updated: September 22, 2014 00:49 IST

२५ वर्षे दुर्लक्ष केल्याने कोसळण्याच्या स्थितीत

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या इमारती फार जुन्या असून, त्या वापरास धोकादायक आहेत़ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतानाच मोडकळीस आलेल्या इमारतींकडे मात्र, शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़ जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १९ लाख २०६१ असून, त्यापैकी १५ लाख ४,४१ लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू ८४५ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत़ त्यामध्ये पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, यशवंत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामसचिवालय योजना व अन्य योजनांचा समावेश आहे़ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असताना आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करुन शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत़ त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे़ ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींच्या इमारती सुमारे २५ वर्षांपूर्वीच्या आहेत़ या इमारती वापरणे धोकादायक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून काढण्यात आला आहे़ धोकादायक असलेल्या या ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत मोडकळीस आले असून, काही इमारतींच्या भिंतीना तडे गेले आहेत़ बहुतांश ग्रामपंचायतींच्या छपराची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये कर्मचारी व लोकप्रतिनिधी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्र भिजल्याने जुनी आणि महत्त्वाची कागदपत्र खराब होत आहेत़ त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे़ गावच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाकडे निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ या ग्रामपंचायत इमारतींची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.ाठ ग्रामपंचायती भाड्याच्या जागेत जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींची कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत़ त्यामध्ये खेडमधील ४, चिपळुणातील २ आणि खेड व लांजातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ या ग्रामपंचायतीना स्वमालकीच्या वास्तू कधी तयार होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ एकीकडे ग्रामीण भागापर्यंत प्रशासकीय सेवा गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असताना दुसरीकडे इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुका ग्रामपंचायतींच्या इमारती मंडणगड १२ दापोली ५० खेड २४ चिपळूण ३७ गुहागर २० संगमेश्वर १४ रत्नागिरी २६ लांजा १५ राजापूर १२ एकूण २१०