शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

गरजूंना अन्नधान्य किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

राजापूर : बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक - मालक संघटना यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना ...

राजापूर : बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक - मालक संघटना यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे रिक्षा व्यावसायिक संकटात आले आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

वेबिनारचे आयोजन

रत्नागिरी : खरीप हंगामातील भात पीक खत व्यवस्थापन व यांत्रिकीकरण या विषयावर ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांवार कारवाई होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती, रमाई घरकुल, सौरपथदीप, तांडा वस्ती अशा योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणी होते. पण या योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रश्नांवर समितीच्या बैठकीत चर्चा होते तेव्हा अधिकारी सूचना देऊनही उपस्थित न राहिल्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई हाेणार असल्याची माहिती सभापती परर्शुराम कदम यांनी दिली आहे.

कथाकथन स्पर्धेत यश

रत्नागिरी : मंथन पब्लिसिटी लिमिटेड व रायडर बॉईज ग्रुप यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत ल. ग. पटवर्धन शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी स्वरा खानोलकर या विद्यार्थिनीने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती.

सेवा कोलमडली

दापोली : दापोलीत बीएसएनएलची इंटरनेट सुविधा कोलमडल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दापोलीत गेली अनेक वर्षे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. सेवा ठप्पमुळे कामे होत नाहीत व आर्थिक नुकसानही होत आहे. काही गावात दुसरी सेवाही नाही. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांचे कौतुक

चिपळूण : कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी चिपळूण पोलीस स्थानकाला भेट दिली व तिथे असणाऱ्या सर्व पोलिसांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी चिपळुणात घडलेल्या घटनेच्या तपासात आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले. त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

मच्छिमारांचे लसीकरण

गुहागर : महिनाभरानंतर मच्छिमारांचा हंगाम सुरू होणार असून, मासेमारीसाठी समुद्रात जाणारे मच्छिमार बांधव दोन - चार महिने परत येत नाहीत. यामुळे कोरोना काळात मच्छिमारांना लसीकरणासाठी प्राध्यान्यक्रम देण्याबाबत जिल्हा परिषद सभेत चर्चा करण्यात आली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सदस्य महेश नाटेकर यांनी दिली.