शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

विनाअडचण गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

रत्नागिरी : शहरामध्ये गणेशोत्सव विनाअडचण साजरा व्हावा, यासाठी सर्वच खात्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह रत्नागिरीतील अन्य ...

रत्नागिरी : शहरामध्ये गणेशोत्सव विनाअडचण साजरा व्हावा, यासाठी सर्वच खात्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह रत्नागिरीतील अन्य शासकीय कार्यालयांची एकत्रित बैठक मंगळवारी उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी प्रत्येक खात्याला त्यांची जबाबदारी नेमून देण्यात आली. वाघमारे यांनी संबंधित खात्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषद खात्यातील अधिकारी यांना शहरातील रस्ते, मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावरील वीज सुरू असणे, विद्युत वाहिनीवरील फांद्या तोडणे, अनावश्यक फेरीवाल्यांचे नियोजन करणे याबाबत सूचना केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा गणेशोत्सवाच्या काळात सुरळीत राहावा, अत्यावश्यक नंबर देऊन ठेवणे, जेणेकरून कुठेही काही अडचण आली, तर तत्काळ संपर्क करता येईल. एसटी चालकांना व वाहकांना योग्य त्या सूचना देणे, सूचनांचे तंतोतंत पालन करणे, रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना एस.टी. बसमधून घेऊन जाण्यासाठीचे योग्य नियोजन करावे व रेल्वे स्थानकावर एस.टी.कडून माहिती केंद्र उभारावे, अशी सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांचे योग्य नियोजन करावे, ज्या प्रवाशांकडे तिकीट असेल अशाच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पाठवावे, त्यांना सोडायला आलेल्या नातेवाईकांना पाठवू नये. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला रिक्षा संघटनेवाले उपस्थित होते.

या बैठकीमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी, दोन दिवस राम आळीतून वाहतुकीसाठी बंद असेल, असे सांगितले. या बैठकीला शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, उपप्रादेशिक परिवहन खात्याचे संतोष काटकर, रेल्वे प्रशासनाचे अजित मधाले उपस्थित होते.