शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अपंगांसाठी शासनाचं पांगळं धोरण

By admin | Updated: January 29, 2015 23:41 IST

कुठली सक्ती, कुठला अधिकार? : विशेष शिक्षकच नसल्याने गैरसोय

रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या हजारो अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकच नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या अधिकारापासून मोठ्या प्रमाणात अपंग मुले वंचित राहत आहेत.अपंग विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारिरीक अपंग हाच विषय येत नाही. परंतु कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार येतात. या प्रकारांमधील विद्यार्थ्यांना हे विशेष शिक्षण मिळण्याची आवश्यकता असेल. कर्णबधीर, मतिमंद अशा विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी डी. एड. मध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम असतो आणि तो पूर्ण केलेला शिक्षकच अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षण देत असतो. पण जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी रत्नागिरी तालुक्यात केवळ आठच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत जवळपास १२५९ विद्यार्थी अपंग आहेत. त्यामुळे अन्य शिक्षकांच्या माथीच या मुलांचे शिक्षण मारले जात आहे. ते शिक्षक आपल्याला जमेल तसे या अपंग विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या ससेहोलपट होत आहे.सन २०१४-१५च्या यु - डाईसच्या आकडेवारीनुसार राज्यात २ लाख ९३ हजार २८३ बालके ही विविध कारणांनी अपंग आहेत. काही विद्यार्थी समाजकल्याण अंतर्गत चालणाऱ्या विशेष शाळेत दाखल आहेत. जिल्ह्यात अशी एकही शाळा नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास ५ ते ६ हजार अपंग विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळांमध्येच दाखल होत आहेत आणि तेथे त्यांना सामान्य शिक्षकांकडून सामान्य मुलांसोबत त्यांच्यादृष्टीने अनाकलनीय असलेल्या अध्यापनाला सामोरे जावे लागत ंआहे. त्यांना विशेष शिक्षकांशिवाय अन्य कोणीही शिकवू शकत नाही कारण त्यांना त्याचे आकलन होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपंग विद्यार्थी असताना, केवळ १९४७ शिक्षक नेमण्यात आले आहेत. अपंग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घ्यावे लागत आहे. (वार्ताहर)धरणे आंदोलन करणारराज्य शासनाच्या या अपंगविरोधी धोरणाविरोधात अपंग विद्यार्थ्यांचे पालक हे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन २ फेब्रुवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. याची दखल घेतली न गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शासनातर्फे देण्यात आला आहे.विशेष शिक्षक संघाचा पाठिंबाया आंदोलनाला विशेष शिक्षक संघानेही पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी विशेष शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.अपंग विद्यार्थ्यांमध्ये कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार.अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीसाठी हवा असतो स्वतंत्र शिक्षक.