शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

अपंगांसाठी शासनाचं पांगळं धोरण

By admin | Updated: January 29, 2015 23:41 IST

कुठली सक्ती, कुठला अधिकार? : विशेष शिक्षकच नसल्याने गैरसोय

रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या हजारो अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकच नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या अधिकारापासून मोठ्या प्रमाणात अपंग मुले वंचित राहत आहेत.अपंग विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारिरीक अपंग हाच विषय येत नाही. परंतु कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार येतात. या प्रकारांमधील विद्यार्थ्यांना हे विशेष शिक्षण मिळण्याची आवश्यकता असेल. कर्णबधीर, मतिमंद अशा विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी डी. एड. मध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम असतो आणि तो पूर्ण केलेला शिक्षकच अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षण देत असतो. पण जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी रत्नागिरी तालुक्यात केवळ आठच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत जवळपास १२५९ विद्यार्थी अपंग आहेत. त्यामुळे अन्य शिक्षकांच्या माथीच या मुलांचे शिक्षण मारले जात आहे. ते शिक्षक आपल्याला जमेल तसे या अपंग विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या ससेहोलपट होत आहे.सन २०१४-१५च्या यु - डाईसच्या आकडेवारीनुसार राज्यात २ लाख ९३ हजार २८३ बालके ही विविध कारणांनी अपंग आहेत. काही विद्यार्थी समाजकल्याण अंतर्गत चालणाऱ्या विशेष शाळेत दाखल आहेत. जिल्ह्यात अशी एकही शाळा नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास ५ ते ६ हजार अपंग विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळांमध्येच दाखल होत आहेत आणि तेथे त्यांना सामान्य शिक्षकांकडून सामान्य मुलांसोबत त्यांच्यादृष्टीने अनाकलनीय असलेल्या अध्यापनाला सामोरे जावे लागत ंआहे. त्यांना विशेष शिक्षकांशिवाय अन्य कोणीही शिकवू शकत नाही कारण त्यांना त्याचे आकलन होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपंग विद्यार्थी असताना, केवळ १९४७ शिक्षक नेमण्यात आले आहेत. अपंग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घ्यावे लागत आहे. (वार्ताहर)धरणे आंदोलन करणारराज्य शासनाच्या या अपंगविरोधी धोरणाविरोधात अपंग विद्यार्थ्यांचे पालक हे आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन २ फेब्रुवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. याची दखल घेतली न गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शासनातर्फे देण्यात आला आहे.विशेष शिक्षक संघाचा पाठिंबाया आंदोलनाला विशेष शिक्षक संघानेही पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी विशेष शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.अपंग विद्यार्थ्यांमध्ये कर्णबधीर, वाचादोष, अल्पदृष्टी, अंध, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, स्वमग्न असे विविध प्रकार.अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीसाठी हवा असतो स्वतंत्र शिक्षक.