शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

रत्नागिरीकरांसाठी खूशखबर! शहरातील मुख्य रस्ते होणार गुळगुळीत

By admin | Updated: February 7, 2015 00:07 IST

रत्नागिरीकरांसाठी खूशखबर! शहरातील मुख्य रस्ते होणार गुळगुळीत

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराची विकासकामे साडेसातीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. नवीन वर्षात रत्नागिरीकरांसाठी खुशखबर असून शहरातील मुख्य रस्ते येत्या महिनाभरात गुळगुळीत होणार आहेत. या डांबरीकरण कामांना येत्या १५ ते २० फेबु्रवारीदरम्यान आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नगरपरिषद व सामंत कन्स्ट्रक्शनमधील वादळाचे ढग आता दूर झाले आहेत. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीने रत्नागिरी पालिकेची काही डांबरीकरणाची कामे २०१४ मध्ये स्वीकारली होती. जुनी बिले येत नसल्याने, नवीन कामांचा विचार होणे कठीण असल्याचे व काळ्या यादीत का टाकू नये, अशी पालिकेची नोटीस अमान्य असल्याचे सामंत कंपनीकडून कळवण्यात आले. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. सामंत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला व तशी शिफारस बांधकाम खात्याकडे करण्यात आली. हे प्रकरण सुरू असतानाच अन्य ठेकेदाराला रस्ता डांबरीकरणाची कामे देण्यात आली. परंतु, त्या कामांना सामंत कंपनीने न्यायालयात स्थगिती मिळविली.पालिका व सामंत कंपनीच्या या वादात रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे रखडली. अखेर आता पालिका व सामंत कंपनी यांच्यातील वाद निवळला असून, २१ कोटींच्या रखडलेल्या रस्ता डांबरीरकरणाच्या कामांना आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधान्याने येत्या पंधरवड्यात जी रस्ता कामे सुरू केली जाणार आहेत. दांडा फिशरिज ते साळवी स्टॉप या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणार असून त्यासाठी ७ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मारुती मंदिर ते नाचणादेवी मंदिरपर्यंतच्या रस्ता कामासाठी ४ कोटी, साळवी स्टॉप ते नाचणे रस्ता डांबरीकरणासाठी २ कोटी तर मारुती मंदिर ते किस्मत बेकरीपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. एकंदर शहरातील रस्ते गुळगुळीत होणार हे नक्की. नगरविकास राज्यमंत्री येणारखरेतर, येत्या ८ फेबु्रवारीपासूनच डांबरीकरण कामाला सुरुवात होणार होती. मात्र, या कामाचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नगरविकास राज्यमत्र्यांच्या हस्ते या रस्ता डांबरीकरणाचा आरंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सामंत कंपनीकडे २१ कोटींची कामे देण्यात आली असली, तरी प्रथम १५ कोटींची कामे तातडीने केली जाणार आहेत.

जलवाहिनी बदलासाठी खोदाईमुख्य रस्त्यांचे डांबरीकरण येत्या पंधरवड्यात सुरू होणार असल्याने, रस्त्यांखालून जाणाऱ्या नादुरुस्त जलवाहिन्या बदलण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. पालिकेच्या पाणी विभागामार्फत जागोजागी रस्ते खणून नादुरूस्त जलवाहिन्या बदलण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून वेगात सुरू आहे. रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर, पुन्हा या कामासाठी रस्ते खणले जाता नयेत, ही भूमिका ठेवूनच ही कामे केली जात आहेत. मात्र, या कामांमुळे आरोग्यमंदिर, मारुतीमंदिर तसेच मजगाव रस्ता तिठ्यावर गेल्या दोन दिवसांत वाहतूकीची कोंडी होते आहे.