शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई हाेणार नाही ही समजूत मनातून काढून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. तत्काळ निर्णय घेण्यापूर्वी एक संधी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. तत्काळ निर्णय घेण्यापूर्वी एक संधी देत आहे. काही ठिकाणी पदे कमी असल्यामुळे कामे झाली नाहीत तर कारवाई होणार नाही ही चुकीची समजूत मनातून काढून टाका. दर आठवड्याला एक तर महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके आली पाहिजेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली.

गुहागर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, महेश नाटेकर, नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत मनरेगा अंतर्गत आपण ठरावीक विकास कामे करत होतो. परंतु, यातून अनेक कामे करता येऊ शकतात. गुहागर तालुक्यात कार्य पत्रिका (जाॅबकार्ड) धारक संख्या जास्त आहे. परंतु, त्यातील सक्रिय कमी आहेत. मनरेगाअंतर्गत कामासाठी ठेकेदार पद्धत नसल्याने त्यांना सक्रिय करण्याची गरज आहे. जनजीवन मिशन अंतर्गत ‘अ’ वर्गातील चार पैकी तीन गावांची तर ‘ब’ वर्गातील ११४ पैकी ७२ गावांची अंदाजपत्रके तयार आहेत. उर्वरित गावाची अंदाजपत्रके तयार करून लवकरात लवकर पाठवावीत, अशी सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

काेरोनाची दुसरी लाट कमी करण्यासाठी व तिसरी लाट रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवावेत. तसेच १ ऑगस्टपासून मच्छिमारी सुरू होईल. तालुक्यात २ हजारपैकी ५४५ जणांचे लसीकरण झाले आहे. ते बाहेर जातील या पूर्वीच नियोजन करून त्यांना प्रामुख्याने लस द्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला आलेला निधी परत जाता कामा नये. प्रत्येक विभागाने आपल्याला आलेल्या निधीचे काम माहिती घेऊन जबाबदारीने पार पाडा. नेहमीप्रमाणे बांधकाम विभागावर घालू नका, अशी सक्त ताकीद विक्रम जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

जिल्हाधिकारी यांनी काेरोना तपासणीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावात तपासणी करा. तालुक्यात २४ आयसोलेटेड असून, तिथे एकही रुग्ण नाही. काेरोना रुग्णाला आपण बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत काेरोना पसरणे थांबणार नाही. ग्रामकृतीदल, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी आयसोलेटेड सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांनी दिल्या.