शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इंधनाचे दर वाढल्याने भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के दराने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे दर काहीअंशी खाली आल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांना वाढती मागणी आहे. बाजारात परजिल्ह्यांतील तसेच गावठी भाज्या उपलब्ध असून इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. फरसबी, गवार, भेंडी, सिमला मिरची, गाजर, मटार, घेवडा, कोबी, फ्लॉवरसारख्या विविध भाज्यांच्या दरात वीस टक्केने वाढ झाली असल्याने गृहिणींना जमाखर्चाची जुळणी करणे अवघड बनले आहे.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच केले जाते. तिखटासाठी लागणारी लाल मिरची बाजारात उपलब्ध असून १५० ते ३५० रुपयांच्या दरात मिरची विक्री सुरू असून मागणीही वाढती आहे.

कांदा, बटाटा, लसणाचा वापर सर्रास स्वयंपाकात केला जातो. गेले पाच-सहा महिने कांद्यांच्या दरात चढउतार सुरू आहे. कांदा १७ ते २० रुपये, तर बटाट्याची २१ ते २५ रुपयाच्या घरात विक्री सुरू आहे. लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने कांद्याला वाढती मागणी आहे.

ऋतुमानामुळे उत्पादनावर परिणाम झाला तरी तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ३५० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू असून दर मात्र सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरचे आहेत.

उष्मा वाढल्यामुळे कलिंगडाचा खप वाढला आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यांतून कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. १५ ते २० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अखंड, कापलेले कलिंगड याची विक्री सुरू आहे.

महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच भाज्यांच्या दरातील वाढ परवडेनाशी झाली आहे. महागाईवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने होत नसल्याचे दिसत आहे.

- जयश्री मोरे, गृहिणी.

इंधनाच्या दरात वाढ झाली की, भाज्यांच्या दरात वाढ होते. परिणामी, ग्राहकांना खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड होत आहे. शासनाकडून सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

- वेदिका पवार, गृहिणी.