शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

इंधनाचे दर वाढल्याने भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के दराने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे दर काहीअंशी खाली आल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांना वाढती मागणी आहे. बाजारात परजिल्ह्यांतील तसेच गावठी भाज्या उपलब्ध असून इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. फरसबी, गवार, भेंडी, सिमला मिरची, गाजर, मटार, घेवडा, कोबी, फ्लॉवरसारख्या विविध भाज्यांच्या दरात वीस टक्केने वाढ झाली असल्याने गृहिणींना जमाखर्चाची जुळणी करणे अवघड बनले आहे.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच केले जाते. तिखटासाठी लागणारी लाल मिरची बाजारात उपलब्ध असून १५० ते ३५० रुपयांच्या दरात मिरची विक्री सुरू असून मागणीही वाढती आहे.

कांदा, बटाटा, लसणाचा वापर सर्रास स्वयंपाकात केला जातो. गेले पाच-सहा महिने कांद्यांच्या दरात चढउतार सुरू आहे. कांदा १७ ते २० रुपये, तर बटाट्याची २१ ते २५ रुपयाच्या घरात विक्री सुरू आहे. लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने कांद्याला वाढती मागणी आहे.

ऋतुमानामुळे उत्पादनावर परिणाम झाला तरी तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ३५० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू असून दर मात्र सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरचे आहेत.

उष्मा वाढल्यामुळे कलिंगडाचा खप वाढला आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यांतून कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. १५ ते २० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अखंड, कापलेले कलिंगड याची विक्री सुरू आहे.

महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच भाज्यांच्या दरातील वाढ परवडेनाशी झाली आहे. महागाईवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने होत नसल्याचे दिसत आहे.

- जयश्री मोरे, गृहिणी.

इंधनाच्या दरात वाढ झाली की, भाज्यांच्या दरात वाढ होते. परिणामी, ग्राहकांना खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड होत आहे. शासनाकडून सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

- वेदिका पवार, गृहिणी.