शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

इंधनाचे दर वाढल्याने भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के दराने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे दर काहीअंशी खाली आल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांना वाढती मागणी आहे. बाजारात परजिल्ह्यांतील तसेच गावठी भाज्या उपलब्ध असून इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. फरसबी, गवार, भेंडी, सिमला मिरची, गाजर, मटार, घेवडा, कोबी, फ्लॉवरसारख्या विविध भाज्यांच्या दरात वीस टक्केने वाढ झाली असल्याने गृहिणींना जमाखर्चाची जुळणी करणे अवघड बनले आहे.

वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच केले जाते. तिखटासाठी लागणारी लाल मिरची बाजारात उपलब्ध असून १५० ते ३५० रुपयांच्या दरात मिरची विक्री सुरू असून मागणीही वाढती आहे.

कांदा, बटाटा, लसणाचा वापर सर्रास स्वयंपाकात केला जातो. गेले पाच-सहा महिने कांद्यांच्या दरात चढउतार सुरू आहे. कांदा १७ ते २० रुपये, तर बटाट्याची २१ ते २५ रुपयाच्या घरात विक्री सुरू आहे. लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने कांद्याला वाढती मागणी आहे.

ऋतुमानामुळे उत्पादनावर परिणाम झाला तरी तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ३५० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू असून दर मात्र सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरचे आहेत.

उष्मा वाढल्यामुळे कलिंगडाचा खप वाढला आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यांतून कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. १५ ते २० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अखंड, कापलेले कलिंगड याची विक्री सुरू आहे.

महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच भाज्यांच्या दरातील वाढ परवडेनाशी झाली आहे. महागाईवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने होत नसल्याचे दिसत आहे.

- जयश्री मोरे, गृहिणी.

इंधनाच्या दरात वाढ झाली की, भाज्यांच्या दरात वाढ होते. परिणामी, ग्राहकांना खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड होत आहे. शासनाकडून सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

- वेदिका पवार, गृहिणी.