शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

अंत्यसंस्काराला आलेल्या सर्वांची विलगीकरणातून सुटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

राजापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व त्यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची मागणी राजापूरवासीयांमधून ...

राजापूर : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व त्यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची मागणी राजापूरवासीयांमधून हाेत आहे. मात्र, या घटनेला २४ तासांहून अधिक काळ उलटला तरी अद्यापही या व्यक्तींना क्वारंटाईन न केल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राजापूर शहरातील कोंढेतड येथील एका व्यक्तीचा लांजा येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी राजापूर नगर परिषदेला मृतदेह ताब्यात देण्यासाठी पत्र दिल्याने तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृतदेह पिशवीतून बाहेर काढून त्यावर धार्मिकरितीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजापूर शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी राजापूर नगर परिषद प्रशासनाने फिर्याद दिल्यानंतर सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ‘त्या’ व्यक्तींवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना लगेचच क्वांरटाईन करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती तसेच क्षेत्र प्रतिबंधित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र, जनतेच्या या मागणीकडे प्रशासनाने अद्यापही कानाडोळा केला असून, जनतेवर साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करणाऱ्या व आता जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.