शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भात उत्पादनाची चारसूत्री पध्दत व त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

अन्नद्रव्याचा वापर वाढीव उत्पादनासाठी महत्त्वाचे पालाश हे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलीकाॅनअभावी भात नत्र खताचा कार्यक्षमरित्या उपयोग करू शकत नाही ...

अन्नद्रव्याचा वापर

वाढीव उत्पादनासाठी महत्त्वाचे पालाश हे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलीकाॅनअभावी भात नत्र खताचा कार्यक्षमरित्या उपयोग करू शकत नाही व रोगकिडीस लवकर बळी पडते. थोडक्यात भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना पालाशचा व सिलीकाॅनचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे गरजेचे आहे. भातपिकाच्या दीर्घकालीन उत्पादन वाढीसाठी भात पिकाने जमिनीतून घेतलेला पालाश व सिलीकाॅन जमिनीस परत करणे म्हणजेच त्याचा फेरवापर करणे हा एक परवडणारा उत्तम उपाय आहे, असे लक्षात येईल. भात पिकातील पालाश व सिलीकाॅन फेरवापरासाठी शेतकरी खालील दोन पध्दतींचा अवलंब करू शकतात.

वाळलेला भाताचा पेंढा भात लावणीपूर्वी हेक्टरी फक्त दोन टन या प्रमाणात शेवटच्या चिखलणीनंतर पसरावा. नंतर पायाने तुडवून चिखलात गाडावा. असे केल्याने पालाश व सिलीकाॅनचा पुरवठा होऊ शकतो.

तुसाची राख मिसळावी

भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोप वाफ्यात प्रत्येक चाैरस मीटरला अर्धा ते एक किलो या प्रमाणात बी पेरण्यापूर्वी ४ ते १० सेंटीमीटर खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे. तुसाची काळसर राख (पांढरी शुभ्र राख नव्हे) भाताचे तूस राबात जाळून करता येईल. असे करण्यामुळे राख मिळते. जळताना निर्माण होणारी उष्णता वाया जाते. योग्य प्रतिची काळसर राख तयार करावी

हिरवळीचे खत

गिरीपुष्पाच्या फांद्या बुंध्यापासून (३०-४०) सें. मी. उंचीवर कापाव्यात व शेवटच्या चिखलणीपूर्वी ६ ते ७ दिवस अगोदर शेतात पसराव्यात. या कालावधीत फांद्यावरील पाने शेतात गळून पडतात. त्यानंतर उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी अगर अन्य शेतीच्या कामासाठी वापराव्यात व शेवटची चिखलणी नेहमीप्रमाणे करावी. असे केल्याने शेताला सेंद्रिय खतातून हेक्टरी १२-१५ किलो नत्र मिळेल. हिरवळीचे खत शेतकऱ्यांना परवडते. नत्राचा पुरवठा रासायनिक खताला पूरक ठरतो.