शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर जिल्ह्यात उरलेय ‘चार टक्क्यांची काँग्रेस’

By admin | Updated: October 20, 2014 22:35 IST

काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता

रत्नागिरी : ज्या काँग्रेसची पूर्वी रत्नागिरीत एकसंघ ताकद होती. त्या ताकदीला गेली अनेक वर्षे उतरती कळा लागली आहे. शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती वाढली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या केवळ ४ टक्के मतदारांनीच काँग्रेसला हात दिला आहे.काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेस भुवन हे जिल्ह्यातील राजकारणाचे एक मुख्य केंद्र होते. मात्र, काँग्रेसपासून राष्ट्रवादी अलग झाली आणि काँग्रेसला अपशकुन झाला. तो त्यानंतर संपलाच नाही. अपवाद फक्त नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पाच वर्षांचा! या कालावधीत काँग्रेसला थोडेफार चांगले दिवस होते. राणेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आणि जिल्ह्यातील दोन तत्कालीन आमदार काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ते निवडूनही आले. मात्र, त्यानंतर त्यांच्या यशालाही उतरती कळा लागली आणि एकेक बुरूज काँग्रेसच्या हातून निसटू लागला.शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्यापुढील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेची नंबर १ची राजकीय शत्रू झाली. मात्र, हे शत्रूत्वही फार काळ टिकले नाही. ग्रामपंचायती, त्यानंतर पंचायत समित्या, नगरपरिषदा यामध्ये काँग्रेसची झपाट्याने पीछेहाट झाली. राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यावर असलेला अंमलही नाहीसा झाला. तो एवढा झाला की, त्यांचे समर्थक तत्कालीन आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनीही शिवसेनेची वाट धरली.ज्या त्वेषाने राणे यांनी शिवसेनेच्या बुरुजाला सुरुंग लावले, त्याच वेगाने काँग्रेसच्या यशाला ठिगळं पडू लागली. या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसच्या संपूर्ण जिल्ह्यातील मते ५३ हजार ९७४ इतकी घसरली. पाठ थोपटायचीच झाली तर मनसेपेक्षा ४५ हजार ६२ मते जास्त! यापेक्षा काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. गेले काही दिवस काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. पक्षाचे ‘व्हिजन’ राबवताना अनेक अडचणी येत आहेत. वरिष्ठ पातळीवरून घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. ती एवढी वाढलेय की, त्यामध्ये साद घालूनही पक्षासाठी धावायची ताकद उरलेली नाही.वाढलेली महागाई, सिलिंडर, गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढ याचा परिणाम जनतेवर एवढा झाला आणि त्याचा फटका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला बसला. यशही वारंवार हुलकावणी देत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. त्यामुळे कार्यकर्तेच विस्फारू लागले आहेत आणि ही परिस्थिती हाताळणारे जिल्हा नेतृत्वही तेवढे सक्षम नसल्याने काँग्रेस जिल्ह्यात नेतृत्वहीन झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत बसला आहे आणि विशेष म्हणजे खुद्द जिल्हाध्यक्षांनाही या निवडणुकीच्या लढाईत भाग घेतल्याने काँग्रेसची स्थिती कळली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आलेली ही मरगळ पक्षासाठी आणखी अडचणीची ठरणार आहे. सध्याचा विचार करता जिल्ह्यात १२ लाख ३९ हजार २०१ मतदार आहेत. त्यापैकी या निवडणुकीत ५३ हजार ९७४ एवढी मते जिल्ह्यात काँग्रेसला मिळाली आहेत आणि ही एकूण मतदारांच्या ४.३५ टक्के एवढी आहेत. काँग्रेसची झालेली ही घसरण आताच सावरली नाही, तर पाच वर्षांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वृध्दत्वाकडे गेलेली दिसेल. (प्रतिनिधी)