शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर जिल्ह्यात उरलेय ‘चार टक्क्यांची काँग्रेस’

By admin | Updated: October 20, 2014 22:35 IST

काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता

रत्नागिरी : ज्या काँग्रेसची पूर्वी रत्नागिरीत एकसंघ ताकद होती. त्या ताकदीला गेली अनेक वर्षे उतरती कळा लागली आहे. शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती वाढली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या केवळ ४ टक्के मतदारांनीच काँग्रेसला हात दिला आहे.काँग्रेस ज्यावेळी एकसंघ होती, तोपर्यंत काँग्रेस हा जिल्ह्यातील प्रमुख पक्षांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेस भुवन हे जिल्ह्यातील राजकारणाचे एक मुख्य केंद्र होते. मात्र, काँग्रेसपासून राष्ट्रवादी अलग झाली आणि काँग्रेसला अपशकुन झाला. तो त्यानंतर संपलाच नाही. अपवाद फक्त नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पाच वर्षांचा! या कालावधीत काँग्रेसला थोडेफार चांगले दिवस होते. राणेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आणि जिल्ह्यातील दोन तत्कालीन आमदार काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ते निवडूनही आले. मात्र, त्यानंतर त्यांच्या यशालाही उतरती कळा लागली आणि एकेक बुरूज काँग्रेसच्या हातून निसटू लागला.शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्यापुढील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेची नंबर १ची राजकीय शत्रू झाली. मात्र, हे शत्रूत्वही फार काळ टिकले नाही. ग्रामपंचायती, त्यानंतर पंचायत समित्या, नगरपरिषदा यामध्ये काँग्रेसची झपाट्याने पीछेहाट झाली. राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यावर असलेला अंमलही नाहीसा झाला. तो एवढा झाला की, त्यांचे समर्थक तत्कालीन आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनीही शिवसेनेची वाट धरली.ज्या त्वेषाने राणे यांनी शिवसेनेच्या बुरुजाला सुरुंग लावले, त्याच वेगाने काँग्रेसच्या यशाला ठिगळं पडू लागली. या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसच्या संपूर्ण जिल्ह्यातील मते ५३ हजार ९७४ इतकी घसरली. पाठ थोपटायचीच झाली तर मनसेपेक्षा ४५ हजार ६२ मते जास्त! यापेक्षा काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. गेले काही दिवस काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. पक्षाचे ‘व्हिजन’ राबवताना अनेक अडचणी येत आहेत. वरिष्ठ पातळीवरून घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. ती एवढी वाढलेय की, त्यामध्ये साद घालूनही पक्षासाठी धावायची ताकद उरलेली नाही.वाढलेली महागाई, सिलिंडर, गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढ याचा परिणाम जनतेवर एवढा झाला आणि त्याचा फटका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला बसला. यशही वारंवार हुलकावणी देत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. त्यामुळे कार्यकर्तेच विस्फारू लागले आहेत आणि ही परिस्थिती हाताळणारे जिल्हा नेतृत्वही तेवढे सक्षम नसल्याने काँग्रेस जिल्ह्यात नेतृत्वहीन झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत बसला आहे आणि विशेष म्हणजे खुद्द जिल्हाध्यक्षांनाही या निवडणुकीच्या लढाईत भाग घेतल्याने काँग्रेसची स्थिती कळली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आलेली ही मरगळ पक्षासाठी आणखी अडचणीची ठरणार आहे. सध्याचा विचार करता जिल्ह्यात १२ लाख ३९ हजार २०१ मतदार आहेत. त्यापैकी या निवडणुकीत ५३ हजार ९७४ एवढी मते जिल्ह्यात काँग्रेसला मिळाली आहेत आणि ही एकूण मतदारांच्या ४.३५ टक्के एवढी आहेत. काँग्रेसची झालेली ही घसरण आताच सावरली नाही, तर पाच वर्षांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वृध्दत्वाकडे गेलेली दिसेल. (प्रतिनिधी)