शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

हिंमतगड किल्ल्यावरील तटबंदी सदृढीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा ...

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा आणणारी टाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू असलेले तटबंदी सदृढीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. किल्ल्याची डागडुजी करत असताना पुरातत्व खात्याने यासंदर्भात संशोधन शास्त्राचे आधारे संकलित केलेली माहिती प्रकाशित करत ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूपास अजिबात धक्का पोहाेचू न देण्याची मागणी तालुक्यातील इतिहासप्रेमींमधून केली जात आहे. राज्याचे सांस्कृतिक खात्याचे माध्यमातून किल्याचे रूपडे पालटण्याचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.

इतिहासाच्या पुस्तकांत हिंमतगड किल्ल्याचा संदर्भ वारंवार सापडत आहे. पुरातत्व खात्याने संशोधन करून मिळविलेली भूतकाळातील माहिती नवीन पिढीसमोर आणण्याची आवश्यकता इतिहासप्रेमींमधून व्यक्त हाेत आहे. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या हिंमतगड किल्ल्याची दुरुस्ती करताना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वारसास्थळांचे संरक्षण करताना आवश्यक असलेल्या खबरदारीमध्ये वारशाच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होता कामा नये याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोणाचीही मान्यता नसताना अगदी प्रवेशद्वारासमोर पाण्याची टाकी उभी करून विद्रुपीकरण कोणी केले. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही प्रवेशद्वाराला लागूनच पाण्याची टाकी उभी केल्याने आज मुख्यद्वारासमोरेचे किल्ल्याचे छायाचित्र इंटरनेटवरही उपलब्ध नाही. कारण नव्याने बांधलेली पाण्याची टाकी हे आहे, यासंदर्भात स्थानिक माध्यमे व इतिहासप्रेमींना सातत्याने प्रश्न विचारूनही पाण्याची टाकी त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून किल्ल्याची तटबंदी व आतील घरटी मजबूत करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेले बुरूज या मजबूत करण्याचे काम ठेकेदारास देण्यात आला. तटबंदीच्या कामात चक्क पुळण (समुद्रकिनारी असलेली वाळू) वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे. या कामाचे सातत्य व गुणवत्ता याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. पूर्ण तटंबदीच्या बाजूने बाहेरील बाजूने जुन्या पायवाटा रद्द करून चिऱ्याची भिंत तटबंदीस आधार देण्याकरिता उभी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ स्वरूपात मोठे बदल झाले आहेत व हे बदल मूळ स्वरूपाचे भाग बनून गेल्यासाखेच वाटत आहेत. किल्ल्यासंदर्भातील संशोधनाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नसल्यास मूळ स्वरूपातील छेडाछेडाचा हा प्रकार फारच गंभीर आहे. तीन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी तोफ आढळली असल्याने जमिनीच्या पोटात भूतकाळातील अजूनही काही गुपिते लपून असण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या शंका व चिंतांचे निरसन पुरातत्व खात्याने करण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक पातळीवर शासन व प्रशासनाने हाती घेतलेले विकासाचे उपक्रम येथील पर्यटन वाढीसाठी प्रेरक ठरणारे आहेत, हे खरे असले तरी किल्ल्यावर मानवी वस्ती नाही. त्यामुळे असामाजिक तथ्यांचे केंद्र बनलेला किल्ले हिंमतगड गुप्त धनाचे साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी येथे भूतकाळात बेकायदेशीर मार्गाने खोदाकामही झाले आहे. किल्ल्याच्या परिसरास लागून बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरू असल्याने येथे सुरुंग स्फोट व रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डबर या गौणखनिजाचे उत्खननही झाले आहे. याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे.