शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

हिंमतगड किल्ल्यावरील तटबंदी सदृढीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा ...

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा आणणारी टाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू असलेले तटबंदी सदृढीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. किल्ल्याची डागडुजी करत असताना पुरातत्व खात्याने यासंदर्भात संशोधन शास्त्राचे आधारे संकलित केलेली माहिती प्रकाशित करत ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूपास अजिबात धक्का पोहाेचू न देण्याची मागणी तालुक्यातील इतिहासप्रेमींमधून केली जात आहे. राज्याचे सांस्कृतिक खात्याचे माध्यमातून किल्याचे रूपडे पालटण्याचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.

इतिहासाच्या पुस्तकांत हिंमतगड किल्ल्याचा संदर्भ वारंवार सापडत आहे. पुरातत्व खात्याने संशोधन करून मिळविलेली भूतकाळातील माहिती नवीन पिढीसमोर आणण्याची आवश्यकता इतिहासप्रेमींमधून व्यक्त हाेत आहे. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या हिंमतगड किल्ल्याची दुरुस्ती करताना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वारसास्थळांचे संरक्षण करताना आवश्यक असलेल्या खबरदारीमध्ये वारशाच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होता कामा नये याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोणाचीही मान्यता नसताना अगदी प्रवेशद्वारासमोर पाण्याची टाकी उभी करून विद्रुपीकरण कोणी केले. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही प्रवेशद्वाराला लागूनच पाण्याची टाकी उभी केल्याने आज मुख्यद्वारासमोरेचे किल्ल्याचे छायाचित्र इंटरनेटवरही उपलब्ध नाही. कारण नव्याने बांधलेली पाण्याची टाकी हे आहे, यासंदर्भात स्थानिक माध्यमे व इतिहासप्रेमींना सातत्याने प्रश्न विचारूनही पाण्याची टाकी त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून किल्ल्याची तटबंदी व आतील घरटी मजबूत करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेले बुरूज या मजबूत करण्याचे काम ठेकेदारास देण्यात आला. तटबंदीच्या कामात चक्क पुळण (समुद्रकिनारी असलेली वाळू) वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे. या कामाचे सातत्य व गुणवत्ता याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. पूर्ण तटंबदीच्या बाजूने बाहेरील बाजूने जुन्या पायवाटा रद्द करून चिऱ्याची भिंत तटबंदीस आधार देण्याकरिता उभी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ स्वरूपात मोठे बदल झाले आहेत व हे बदल मूळ स्वरूपाचे भाग बनून गेल्यासाखेच वाटत आहेत. किल्ल्यासंदर्भातील संशोधनाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नसल्यास मूळ स्वरूपातील छेडाछेडाचा हा प्रकार फारच गंभीर आहे. तीन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी तोफ आढळली असल्याने जमिनीच्या पोटात भूतकाळातील अजूनही काही गुपिते लपून असण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या शंका व चिंतांचे निरसन पुरातत्व खात्याने करण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक पातळीवर शासन व प्रशासनाने हाती घेतलेले विकासाचे उपक्रम येथील पर्यटन वाढीसाठी प्रेरक ठरणारे आहेत, हे खरे असले तरी किल्ल्यावर मानवी वस्ती नाही. त्यामुळे असामाजिक तथ्यांचे केंद्र बनलेला किल्ले हिंमतगड गुप्त धनाचे साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी येथे भूतकाळात बेकायदेशीर मार्गाने खोदाकामही झाले आहे. किल्ल्याच्या परिसरास लागून बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरू असल्याने येथे सुरुंग स्फोट व रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डबर या गौणखनिजाचे उत्खननही झाले आहे. याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे.