शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

हिंमतगड किल्ल्यावरील तटबंदी सदृढीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा ...

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा आणणारी टाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू असलेले तटबंदी सदृढीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. किल्ल्याची डागडुजी करत असताना पुरातत्व खात्याने यासंदर्भात संशोधन शास्त्राचे आधारे संकलित केलेली माहिती प्रकाशित करत ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूपास अजिबात धक्का पोहाेचू न देण्याची मागणी तालुक्यातील इतिहासप्रेमींमधून केली जात आहे. राज्याचे सांस्कृतिक खात्याचे माध्यमातून किल्याचे रूपडे पालटण्याचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.

इतिहासाच्या पुस्तकांत हिंमतगड किल्ल्याचा संदर्भ वारंवार सापडत आहे. पुरातत्व खात्याने संशोधन करून मिळविलेली भूतकाळातील माहिती नवीन पिढीसमोर आणण्याची आवश्यकता इतिहासप्रेमींमधून व्यक्त हाेत आहे. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या हिंमतगड किल्ल्याची दुरुस्ती करताना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वारसास्थळांचे संरक्षण करताना आवश्यक असलेल्या खबरदारीमध्ये वारशाच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होता कामा नये याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोणाचीही मान्यता नसताना अगदी प्रवेशद्वारासमोर पाण्याची टाकी उभी करून विद्रुपीकरण कोणी केले. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही प्रवेशद्वाराला लागूनच पाण्याची टाकी उभी केल्याने आज मुख्यद्वारासमोरेचे किल्ल्याचे छायाचित्र इंटरनेटवरही उपलब्ध नाही. कारण नव्याने बांधलेली पाण्याची टाकी हे आहे, यासंदर्भात स्थानिक माध्यमे व इतिहासप्रेमींना सातत्याने प्रश्न विचारूनही पाण्याची टाकी त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून किल्ल्याची तटबंदी व आतील घरटी मजबूत करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेले बुरूज या मजबूत करण्याचे काम ठेकेदारास देण्यात आला. तटबंदीच्या कामात चक्क पुळण (समुद्रकिनारी असलेली वाळू) वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे. या कामाचे सातत्य व गुणवत्ता याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. पूर्ण तटंबदीच्या बाजूने बाहेरील बाजूने जुन्या पायवाटा रद्द करून चिऱ्याची भिंत तटबंदीस आधार देण्याकरिता उभी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ स्वरूपात मोठे बदल झाले आहेत व हे बदल मूळ स्वरूपाचे भाग बनून गेल्यासाखेच वाटत आहेत. किल्ल्यासंदर्भातील संशोधनाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नसल्यास मूळ स्वरूपातील छेडाछेडाचा हा प्रकार फारच गंभीर आहे. तीन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी तोफ आढळली असल्याने जमिनीच्या पोटात भूतकाळातील अजूनही काही गुपिते लपून असण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या शंका व चिंतांचे निरसन पुरातत्व खात्याने करण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक पातळीवर शासन व प्रशासनाने हाती घेतलेले विकासाचे उपक्रम येथील पर्यटन वाढीसाठी प्रेरक ठरणारे आहेत, हे खरे असले तरी किल्ल्यावर मानवी वस्ती नाही. त्यामुळे असामाजिक तथ्यांचे केंद्र बनलेला किल्ले हिंमतगड गुप्त धनाचे साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी येथे भूतकाळात बेकायदेशीर मार्गाने खोदाकामही झाले आहे. किल्ल्याच्या परिसरास लागून बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरू असल्याने येथे सुरुंग स्फोट व रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डबर या गौणखनिजाचे उत्खननही झाले आहे. याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे.