शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागायतदारांचे कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरेशी मदत दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरेशी मदत दिली जात आहे. परंतु, परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बागायतदारांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे किंवा त्यामध्ये सवलत द्यावी. तसेच पुढील सर्व कृषी कर्जे ही पाच टक्के दराने आकारण्यात यावीत, अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय आंबा बागायतदारांच्या बैठकीत करण्यात आला आहे़.

पावस परिसर आंबा बागायतदार सहकारी संस्थेतर्फे पावस येथील झुलेखा दाऊद उर्दू हायस्कूलमध्ये आंबा बागायतदार, शेतकऱ्यांची संयुक्त सभा आयोजित केली होती. या सभेला अक्रम नाखवा, प्रकाश साळवी, सलीम काझी, अनंत आग्रे, मुसद्दीक मुकादम, सुशांत पाटकर, हेमंत खातू, ज्ञानेश पोतकर उपस्थित होते.

चक्रीवादळामुळे आंबा, आंब्याची झाडे, काजू व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल आणि कर्जाच्या पुनर्गठनातील व्याज माफीसंदर्भात चर्चा करण्यात आली. चक्रीवादळात झाडे उन्मळून, तुटून पडल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मेहनत मातीमोल झाली. सर्व आंबा शेतकरी, बागायतदार यांनी शेती कर्ज घेतले आहे. त्यावर विमाही काढला आहे. परंतु विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आजपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत आंबा बागायतदार, शेतकरी यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. तसेच झालेल्या पुनर्गठनातील कोणत्याही वर्षाचा व्याजाचा परतावा मिळालेला नाही. खत, कीटकनाशके, अवजारे यावरचा जीएसटी माफ करण्यात यावा तसेच त्यावर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़

आंबा बागायतदारांना फवारणी पंपासाठी केरोसीनसाठी (रॉकेल) अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांचे विजेचे मीटर महावितरणतर्फे कमर्शियल प्रकारात घेण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार, शेतकरी यांना भरमसाठ बिले येतात. सर्व बिलांवर पोल्ट्री असा उल्लेख आहे. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केले जात आहे. शेतीच्या माफक दराने वीजपुरवठा करण्यात यावा व शेती असा उल्लेख वीजबिलावर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बागायतदार विविध समस्यांवर गेल्या काही वर्षांपासून झगडत आहेत. मात्र सरकारने अद्याप कोणतीही मदत केलेली नाही. यावर स्थानिक आमदार, खासदारांनीही दुर्लक्ष केले आहे. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार आणि कार्यवाही झाली नाही, तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बागायतदार, शेतकरी वेगळा विचार करतील, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे.