शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागायतदारांचे कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरेशी मदत दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पुरेशी मदत दिली जात आहे. परंतु, परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बागायतदारांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे किंवा त्यामध्ये सवलत द्यावी. तसेच पुढील सर्व कृषी कर्जे ही पाच टक्के दराने आकारण्यात यावीत, अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय आंबा बागायतदारांच्या बैठकीत करण्यात आला आहे़.

पावस परिसर आंबा बागायतदार सहकारी संस्थेतर्फे पावस येथील झुलेखा दाऊद उर्दू हायस्कूलमध्ये आंबा बागायतदार, शेतकऱ्यांची संयुक्त सभा आयोजित केली होती. या सभेला अक्रम नाखवा, प्रकाश साळवी, सलीम काझी, अनंत आग्रे, मुसद्दीक मुकादम, सुशांत पाटकर, हेमंत खातू, ज्ञानेश पोतकर उपस्थित होते.

चक्रीवादळामुळे आंबा, आंब्याची झाडे, काजू व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल आणि कर्जाच्या पुनर्गठनातील व्याज माफीसंदर्भात चर्चा करण्यात आली. चक्रीवादळात झाडे उन्मळून, तुटून पडल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मेहनत मातीमोल झाली. सर्व आंबा शेतकरी, बागायतदार यांनी शेती कर्ज घेतले आहे. त्यावर विमाही काढला आहे. परंतु विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आजपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत आंबा बागायतदार, शेतकरी यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. तसेच झालेल्या पुनर्गठनातील कोणत्याही वर्षाचा व्याजाचा परतावा मिळालेला नाही. खत, कीटकनाशके, अवजारे यावरचा जीएसटी माफ करण्यात यावा तसेच त्यावर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़

आंबा बागायतदारांना फवारणी पंपासाठी केरोसीनसाठी (रॉकेल) अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांचे विजेचे मीटर महावितरणतर्फे कमर्शियल प्रकारात घेण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार, शेतकरी यांना भरमसाठ बिले येतात. सर्व बिलांवर पोल्ट्री असा उल्लेख आहे. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केले जात आहे. शेतीच्या माफक दराने वीजपुरवठा करण्यात यावा व शेती असा उल्लेख वीजबिलावर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बागायतदार विविध समस्यांवर गेल्या काही वर्षांपासून झगडत आहेत. मात्र सरकारने अद्याप कोणतीही मदत केलेली नाही. यावर स्थानिक आमदार, खासदारांनीही दुर्लक्ष केले आहे. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार आणि कार्यवाही झाली नाही, तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बागायतदार, शेतकरी वेगळा विचार करतील, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे.