शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पूरग्रस्त शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:36 IST

अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली ...

अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी प्रामुख्याने कृषी मंत्रालयाकडून मदतीच्या आशेवर आहेत. मात्र, अद्यापही ही शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महापुराचे पाणी शहर व लगतच्या शेतात शिरल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. मोठ्या प्रमाणात माती शेतजमिनीत पसरली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती व सोबत तीळ, वरी आदी पिके वाया गेली. महापुरापूर्वीच बहुतांश शेतकऱ्यांच्या भात व अन्य पिकांची लावणी पूर्ण झाली होती. गणेशोत्सवादरम्यान भाताचे हळवे पीक तयार होते. तसेच वरीचे तांदूळ व नाचणीला जोर येतो. ही पिके तयार होण्याच्या प्रक्रियेत असतानाच जुलैमध्ये आलेल्या महापुराच्या मातीत सर्व पिके गाडली गेली.

महापूर ओसरल्यानंतर शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी व शेतजमिनीचे पंचनामे केले. मात्र, नुकसानाबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही अद्यापही झालेली नाही. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रेशनवर धान्य व काही सामाजिक संस्थांकडून अन्नधान्याची मदत यावरच सद्यस्थितीत अवलंबून राहावे लागले आहे. शेतजमीन व पिकांच्या नुकसानाबाबत शासनाकडून पर्यायाने कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा असून, ही नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी करण्यात येत आहे.