शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राजापुरातील पुराचे पाणी ओसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

- राजापूर तालुक्यात १९६ मिलीमीटर पावसाची नोंद लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : गेले चार दिवसांपासून शहर आणि तालुका परिसरात ...

- राजापूर तालुक्यात १९६ मिलीमीटर पावसाची नोंद

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : गेले चार दिवसांपासून शहर आणि तालुका परिसरात झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना बुधवारी पूर आला. या दोन्ही नद्यांनी मध्यरात्रीनंतर पुराची पातळी ओलांडली असून, पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेला वेढा दिला. जवाहर चौकात ध्वजस्तंभाला वेढा देत टिळेकर दुकानापर्यंत पुराच्या पाण्याने धडक दिली. तर शहर बाजारपेठेतही पाणी शिरले हाेते. त्यामुळे शिवाजीपथ, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ, कोंंढेतड भागातील रस्ते पाण्याखाली गेले. मात्र, गुरुवारी सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

राजापूर तालुक्यात बुधवारी १९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन राजापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी सायंकाळी कोदवली व अर्जुना या दोन्ही नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे राजापूर नगरपरिषदेने सायंकाळी ६ वाजता सायरन वाजवून धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे व्यापारी व नागरिक सतर्क झाले होते. मात्र, मध्यरात्री पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत प्रवेश करत शहरातील जवाहर चौकाला वेढा घातला. त्यामुळे शहर बाजारपेठेत पूरपरिस्थिती निर्माण झाली.

पुराचे पाणी बाजारपेठेत शिरू लागताच जवाहर चौक व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे कोणाचेही आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौक परिसर, मासळी मार्केट परिसर पाण्याखाली गेला. चिंचबांध रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला होता. तर शिवाजीपथ व गुजराळी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर वासुकाका जोशी पुलावर पुराचे पाणी आल्याने आंबेवाडी मार्ग बंद झाला तर शीळ गोठणे दोनिवडे मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

गुरुवारी सकाळी मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने शहर बाजारपेठेतील पाणी ओसरू लागल्याने जनजीवन सुरळीत सुरू झाले. जवाहर चौकातील पाणी ओसरल्याने या भागात वर्दळ पूर्ववत सुरू झाली. शहरात पुराचे पाणी शिरल्याने मध्यरात्रीच नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी पुराची पाहणी केली. तर सकाळीच तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी जवाहर चौक परिसराला भेट देऊन पाहणी केली़