शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुदतीआधीच मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर खवळलेल्या समुद्रामुळे हंगामाच्या अखेरीस मच्छिमारांची निराशाच झाली आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मासळी किनाऱ्याकडे ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर खवळलेल्या समुद्रामुळे हंगामाच्या अखेरीस मच्छिमारांची निराशाच झाली आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मासळी किनाऱ्याकडे येऊ लागते. त्यामुळे हंगाम सरतेवेळी शेवटच्या दिवसांत मासे जाळ्यात सापडतात. मात्र, तौक्तेनंतर आलेल्या यास वादळाचाही वातावरणात परिणाम झाल्याने मुदतीआधीच मच्छिमारांना मासेमारी बंद करावी लागली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर माशांच्या निर्यातीवर बंधने आल्याने मासेमारी व्यवसाय आणखीच धोक्यात आला आहे.

मत्स्य खात्याच्या निकषानुसार कोकण किनारपट्टीवरील चालू मासेमारी हंगाम ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर १६ तारखेला तौक्ते चक्रीवादळ कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडकले. त्यामुळे मासेमारीवर संक्रांत आली. वादळात नुकसान होऊ नये, यासाठी मच्छिमारांना हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या सूचनेनुसार ४ दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती.

तौक्ते वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झालेली असतानाच यास वादळाच्या प्रभावाने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यास वादळ जिल्ह्यात धडकले नसले तरी समुद्र खवळलेला होता. त्यामुळे मच्छिमारांनी हंगाम संपण्यापूर्वीच गाशा गुंडाळला. मासेमारी मुदतीआधीच दिनांक १ जूनपूर्वीच बंद केल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम दुष्काळातच गेल्याची प्रतिक्रिया मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जगण्याचा मोठा प्रश्न

कोरोना विषाणूच्या महामारीच्या अगोदरपासूनच गेली काही वर्षे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाची समस्या भेडसावत आहे. मागील हंगामाप्रमाणेच लॉकडाऊनमुळे राहिलेला मत्स्य हंगामही हातून निसटला़. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा राहिला आहे.

हंगामाचे सुरुवातीचे दिवस वाया

दिनांक १ ऑगस्टपासून मासळीच्या हंगामाला सुरुवात होते. मात्र, चालू हंगामाच्या सुरुवातीलाच वादळाने तडाखा दिल्याने सुमारे १५ ते २० दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या मासळी हंगामात मासेमारी उशिरा सुरू झालेली असतानाच तौक्ते आणि यास वादळामुळे हंगाम संपण्यापूर्वीच मासेमारी बंद करावी लागली. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.

नोव्हेंबरमध्ये वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटका

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात अचानक वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारी बंद ठेवावी लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला होता. त्यामुळे काही दिवस अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर ठेवण्यात आल्या होत्या. सततच्या वादळी वातावरणासह चालू हंगामात अनेकदा खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छिमारांवर कर्जाचा बोजा वाढत चालला असल्याने ते मेटाकुटीला आले आहेत.