शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमार आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

पावसाळ्याच्या तयारीवर परिणाम रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची लोक अगोदरच तयारी करतात. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोना ...

पावसाळ्याच्या तयारीवर परिणाम

रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची लोक अगोदरच तयारी करतात. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव असल्याने त्याचा परिणाम या तयारीवर झाल्याचे दिसून येत. पावसाळ्यापूर्वी तयारी करताना मसाले, सुकलेले मासे तसेच अन्य पदार्थ बनवून ठेवले जातात. मात्र, कोरोनामुळे अनेक लोक ही तयारी करू शकलेले नाहीत.

महावितरणची कौतुकास्पद कामगिरी

चिपळूण : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महावितरणला तौक्ते चक्रीवादळाने मोठा फटका दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेक गावांमध्ये झाडांसह विद्युत खांबांची पडझड झाल्याने गावे, वाड्या अंधारमय झाल्या होत्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करून वीजपुरवठा सुरू केला.

मच्छिमारांचे कोट्यवधींचे नुकसान

राजापूर : तौक्ते वादळानंतर यास चक्रीवादळाचा परिणामही मासेमारीवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजूनही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार, उंच लाटा उसळत असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी करणे अजूनही बंद ठेवली आहे. मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजीवड्यात मोहल्ला क्लिनिक सुरू

रत्नागिरी : शहरातील गजबजलेली लोकवस्ती असलेल्या राजीवडा गावामध्ये कोअर कमिटीने माेहल्ला क्लिनिक सुरू केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोअर कमिटीने मोहल्ला क्लिनिकची स्थापना करून अनेकांचा जीव वाचविला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या लाटेतही पोलिसांच्या सहकार्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

रस्ता खोदाईमुळे अपघात

रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला तरी शहर परिसरात नगरपरिषदेकडून खोदाईची कामे कमी झालेली नाहीत. ती कामे अजूनही सुरूच आहेत. शहरातील सन्मित्रनगर ते उद्यमनगरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन लोक जखमी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठेकेदाराचे दुर्लक्ष

रत्नागिरी : शहरात ठिकठिकाणी पाईप टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर ते चर डांबरीकरण करून बुजविण्यात आले. मात्र, चर बुजविल्यानंतर ठेकेदाराकडून रस्त्यावर पडलेल्या खडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाईच्या मागणीचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

रोजगारच गेल्याने हाल

रत्नागिरी : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांचे व्यवसायही बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगारच गेल्याने त्यांना दोनवेळचे जेवणही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.