शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात चिपळूण पोलिसांचे पहिले रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत मोबाईलच्या मिणमिणत्या उजेडाचा आधार घेत पाणी आणि अंधाराचा थरारक सामना करीत पहिले रेस्क्यू चिपळूण पोलिसांच्या टीमने केले. वळवळणारे साप, महापुराच्या पाण्याचा वाढता जोर, अंधाराची भयाणता, सोसाट्याचा वारा, कोसळणारा पाऊस, बोटीत भरणारे पाणी कधीही जिवावर बेतेल अशी स्थिती असताना, चिपळूण पोलिसांच्या पथकाने महापुरात पहिले रेस्क्यू ऑपरेशन केले.

चिपळूणचा महापूर आणि अडकलेले लोक बघितल्यानंतर आताही थरकाप भरत आहे. काही लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढणे अशक्य होते. पोलीस स्थानकात सतत वाचविण्यासाठी फोन येत होते. त्यातील एक म्हणजे शहरातील मार्कंडी भागातील मयूर निवास या ठिकाणी चार महिन्यांचे बाळ आणि त्याची आई महापुराच्या पाण्यात अडकली होती. पाणी क्षणा-क्षणाला वाढत होते, तर त्या दोघांना बाहेर काढायला काही तरी करा, अशी आर्त विनवणी केली जात होती. कोणताही पर्याय नसल्याने सारी यंत्रणा हतबल बनली होती. मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते. सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीहून सीमा शुल्कची टीम आली.

सीमा शुल्कच्या रेस्क्यू बोटीबरोबर सीमा शुल्कचे दोन कर्मचारी पुराच्या पाण्यात उतरले. बोट भोगाळे इथे येताच पाण्याच्या जोरदार माऱ्यामुळे बोट विरुद्ध दिशेला ओढली जाऊ लागली. बोटीत पाणी शिरले होते. चिंचनाका येथे बोट पोहाेचताच एटीएममध्ये एक व्यक्ती अडकल्याचे काहींनी सांगितले. रमा यांच्या कमरेभोवती रोप बांधून बोया पाण्यात फेकला गेला. सीमा शुल्क विभागाच्या एका साथीने पाण्यात झेप घेऊन एटीएमचे शटर वर केले. सुरक्षा रक्षक महेश लोटेकर हे एटीएम मशीनवर उभे हाेते. महेशने बचावकर्त्याच्या अंगावर उडी घेत बोयाचा ताबा घेतला. अथक्‌ प्रयत्नांनी बोयाच्या साहाय्याने महेशला सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. त्याचवेळी आपल्या ऑफिसमध्ये प्रमोद देवधर अडकले असल्याची आरोळी आली. काचेचा दरवाजा लोटून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर मार्कंडी येथे पुरात अडकलेल्या माय-लेकीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत सायंकाळचे साडेसात वाजले होते. पाऊस कोसळतच होता. बोटीत साचलेले पाणी रमा करमरकर काढत होत्या आणि अचानक हातातील टॉर्च पाण्यात पडला. समोर काहीच दिसेनासे झाले. त्यातच मोबाईलची लाईट सुरू करून परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा तोच सामना... बोटीला हेलकावे, भरकटणारी बोट असा संघर्ष करीत महापुरात उतरलेली पहिली रेस्क्यू टीम सहीसलामत परत आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक समद बेग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, रमा करमरकर, संदेश गुजर, गणेश शिंदे, हरेश पेढांबकर व होमगार्ड सुशांत आंब्रे आदी सहभागी होते.