शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अखेर तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

एका शासकीय महामंडळाचे मुंबई येथून कामानिमित्त रत्नागिरीत आलेले अधिकारी २४ रोजी रात्री रत्नागिरीतील आपल्या सहकारी अधिकाऱ्यासह, शहरातील मांडवी ...

एका शासकीय महामंडळाचे मुंबई येथून कामानिमित्त रत्नागिरीत आलेले अधिकारी २४ रोजी रात्री रत्नागिरीतील आपल्या सहकारी अधिकाऱ्यासह, शहरातील मांडवी येथील एका नामांकित हाॅटेलात राहण्याकरिता व भोजनाकरिता गेले होते. सध्या संचारबंदी सुरू असल्याने जेवणाचा विभाग १० वाजता बंद होत आल्याने या अधिकाऱ्यांनी उशीर नको, म्हणून हॉटेलमधील वेटरच्या सांगण्यावरून त्याला आपली शासकीय गाडी पार्क करायला दिली. मात्र, ती पार्क करताना ती तिथल्या भिंतीवर जोरात आदळली. त्यात गाडीचे टायर फुटून इतर मोठे नुकसान झाले.

या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता त्या वेटरकडे गाडी चालविण्याचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले. अधिकाऱ्याने वेटरच्या इतर ओळखपत्राची साॅफ्टकॉपी आपल्या मोबाईलवर पाठवण्याकरिता स्वतःचे व्हिसीटींग कार्ड हॉटेलचे मॅनेजर व तो वेटर यांना दिले. दरम्यान, गाडी आदळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या एका हाॅटेलमधून काही व्यक्ती आत आल्या. यापैकी सुर्वे नामक व्यक्तीने या शासकीय अधिकाऱ्यांपैकी एकाच्या अंगाला हात लावून अरेतुरेच्या भाषेत प्रकरण मिटवण्यास सांगितले. अरे तुरेच्या भाषेत बोलू नका, असे या अधिकाऱ्याने सांगताच, त्या गोष्टीचा राग येऊन सुर्वे व त्यांचे २ मद्यधुंद साथीदार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रयत्न करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हॉटेल कर्मचारी तसेच या हॉटेलात जेवण्यास आलेल्या महिला पाहुण्यांनी या दोन अधिकाऱ्यांची काहीही चूक नसल्याचे सांगून सुर्वे व साथीदार यांना अडविले. अशाप्रकारे पर्यटकांवर हल्ला करून शहराचे नाव बदनाम करत आहात, असेही सुनावले.

संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असूनही या घटनेनंतर तब्बल ७ दिवसानंतर काही माध्यमातून खोट्या बातम्या छापून आणल्या. यात या शासकीय अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक बदनामी करून मद्यधुंद असल्याचे व त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल न केल्याचे म्हटले होते. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड यांनी हे वृत्त धांदात खोटे असल्याचा निर्वाळा दिला असून या शासकीय अधिकाऱ्यांपैकीही कुणीही मद्यपान केले नसल्याचे सांगितले.

गेल्या दीड वर्षांत औद्योगिक क्षेत्रातील अनेक बेकायदेशीर बाबींवर आपण कारवाई केली आहे. त्यामुळे हितसंबंध दुखावलेल्या काही लोकांनी या घटनेचा गैरफायदा घेऊन निराधार, खोट्या बातम्या घटनेच्या ७ दिवसांनंतर छापून आणल्या. आपण कोणतेही गैरवर्तन केलेले नसल्यानेच आमच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल नाही. मात्र,या गैरप्रकाराबाबत आम्ही रितसर अदखलपात्र गुन्ह्याबाबत तक्रार नोंदविल्याचे रत्नागिरीतील प्रादेशिक अधिकारी यांनी सांगितले.