शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘भाग्याेदय’ झाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

अधिवेशनाचे दाेन दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीच गाजवले. अधिवेशन काळात विराेधी पक्ष ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्यावरून ...

अधिवेशनाचे दाेन दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीच गाजवले. अधिवेशन काळात विराेधी पक्ष ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्यावरून सरकारला काेंडीत पकडणार, हे निश्चितच हाेते. अभ्यासू विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारला ‘गुगली’ टाकून त्यांना सभागृहातच पायचीत करणार, याची जाणीव साऱ्यांनाच हाेती. त्यामुळे विराेधी पक्षाला सामाेरे जाण्यासाठी आणि कठाेर निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेत्याची गरज हाेती. अधिवेशनात काय हाेणार, याची कल्पना असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाला पसंती दिली. सध्या तरी त्यांच्याइतका आक्रमक नेता तिन्ही पक्षांमध्ये नाही. (काँग्रेसने कितीही सांगितले तरी काेणीही अशी भूमिका घेतली नसती.) सरकारवर तुटून पडणाऱ्या विराेधी पक्षाला राेखण्याचे काम भास्कर जाधव यांनी केले आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला ते खरे ठरले. भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. जाधव यांच्या या कृतीने भाजप चांगलाच बॅकफूटवर आला. इतकेच काय या आमदारांच्या एकूणच वर्तनाने राज्यात एकच चर्चा झडली. पीठासनावरून धडाकेबाज निर्णय घेतल्याचे बक्षीस म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे अध्यक्षपद भास्कर जाधव यांना मिळाे अगर न मिळाे मात्र, शिवसेनेत असताना आपल्या आक्रमकपणाने विराेधकांना जेरीस आणणाऱ्या भास्कर जाधव यांच्यातील शिवसैनिक पुन्हा एकदा जागा झाल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांनी आजवर अनेकांना आपल्या शिंगावर घेऊन बाजी पलटवून टाकली आहे. शिवसेनेचे प्रवक्तेपद देऊन पक्षाने त्यांची ताकद वाढवली आहे. गेल्या काही वर्षात संयमाची भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधव यांनी आपल्यात आजही जुना शिवसैनिक आहे, याची जणू प्रचितीच दिली आहे. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून बिरुदावली मिळवणाऱ्या भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना विराेधी पक्षाच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. एकाचवेळी १२ आमदारांचे निलंबन केल्याने भाजप नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. अध्यक्ष म्हणून कठाेर निर्णय घेणाऱ्या भास्कर जाधव यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाग्याेदय’ झाल्याचे दिसत आहे. खरंतर ही विराेधी पक्षासाठी धाेक्याची घंटाच म्हणावी लागेल.

- अरुण आडिवरेकर