शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला असून, सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे काही भागात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला असून, सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती कायम आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ८०१.६० (सरासरी ८९.०७ ) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १२० मिलीमीटर इतका पाऊस लांजा तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल मंडणगड तालुक्यात १०२.१० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. उसगाव येथील कृष्णा धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शंकर जानू गोरे यांच्या घराचे ८ हजार रुपये व जनार्दन धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुहागर तालुक्यात वारदई येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे ३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे २७ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा बांध पावसामुळे पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.

गुरुवारीही पावसाचा जोर कायम आहे. दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तुरळक सरी कोसळत असल्या तरी राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूरपरिस्थिती कायम आहे.