शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

स्टरलाईट जमिनीसाठी तीव्र लढा

By admin | Updated: December 22, 2014 00:18 IST

जनरेटा वाढला: ४२ वर्षांपासूनची जमिन परत मिळणार?

रत्नागिरी : मिरजोळे एमआयडिसीतील स्टरलाईट कंपनीच्या अल्युुमिनियम प्रकल्पासाठी गेल्या ४२ वर्षांपूर्वी येथील ३०० शेतकऱ्यांची १२०० एकर जमिन एमआयडिसीने संपादन केली होती. जनविरोधाच्या रेट्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. प्रकल्पासाठी फुुकाच्या भावाने घेतलेली ही जमिन शेतकऱ्यांना अद्याप परत मिळालेली नाही. त्यामुळे जमिन मालकांचा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत संघर्ष समितीने दिले आहेत. रत्नागिरी एमआयडित स्टरलाईट कंपनीच्या अ‍ॅल्युमिनियम प्रकल्पासाठी १९७१-७२ साली रत्नागिरीतील ३०० शेतकऱ्यांची तब्बल १२०० एकर जमिन संपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत जागेवर एमआयडिसीने बोजा लावला. १९८४ साली हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहणार होता. मात्र या प्रदुषणकारी प्रकल्पाला त्यावेळी तीव्र विरोध झाला. प्रकल्पाविरोधात मोर्चे, आंदोलने झाली. त्यामुळे जनप्रक्षोभामुळेच कंपनीला प्रकल्पाचा नाद सोडून द्यावा लागला होता. या जमिनीत ५ हजार हापूूस कलमे असून ही जागा शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळेच ही जागा शेतकऱ्यांना परत केली जावी यासाठी ४२ वर्षे शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. परंतु याबाबत केवळ चालढकलच सुरू असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. एकूणच या प्रकरणाबाबत स्टरलाईट कंपनी न्यायालयात गेल्याने जागेचा गुंता वाढला आहे. तरीही शेतकरी आपल्या जमिनीसाठी लढा तीव्र करणार असून त्यामुळे हा प्रश्न भविष्यात चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी घेतलेली जमिन तीन वर्षात परत केली नाही तर ती मूळ जमिनधारकांना परत देण्याचा एमआयडिसीचा नियम आहे. मात्र १९७१ पासून आजपर्यंत या जागेत स्टरलाईटचा प्रकल्प उभा राहिलेला नाही. त्यामुळे ही जागा परत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याने आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून हा लढा तीव्र करणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष युनूस पडवेकर यांनी दिली. (प्रतिनिधी) ‘जननी सुरक्षा’ झाली पंक्चर पैशाअभावी वाहने जागेवर रत्नागिरी : शासनाची जननीसुरक्षा योजना अत्यंत लोकप्रिय असून त्याचा लाभ अनेकांना झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या यंत्रणेला रत्नागिरीत घरघर लागली आहे. जननी सुरक्षेसाठी धावणाऱ्या दोन रुग्णवाहिका पंक्चर झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच गेल्या चार दिवसांपासून उभ्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठीही पैसे नाहीत का, असा सवाल केला जात आहे. या योजनेतील वाहनांवर काम करणाऱ्या चालकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे चालकांनी असहकार सुरू केला आहे. त्यातच आता गाड्या नादुरुस्त झाल्याने लाभधारकांचे हाल होत आहेत. शासकीय निधी रुग्णालयात आला असूनही दिला जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)