शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर आजार यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात तब्बल १५२ रुग्णांचा बळी गेला असून, स्मशानभूमीमध्ये एकापाठोपाठ एक असे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन लढण्यानेच जगण्याची शाश्वती वाढणार असल्याने आरोग्य यंत्रणाही आता रुक्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सारे काही आटोक्यात येत आहे, असे वातावरण गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तयार झाले होते. मात्र मार्च महिन्यापासून साऱ्याचा नूर पालटला आहे. एका बाजूला कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला अचानक मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी ८ एप्रिल रोजी घेतला. हा रुग्ण परदेशातून खेड तालुक्यातील अलसुरे गावात आला होता. त्यानंतर वर्षभरात आतापर्यंत ५२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ४६ झाली असून, १२ हजार ८२२ रुग्ण बरे झाले आहेत. तकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

एप्रिल, २०२१ मध्ये २३ दिवसांत ७०१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केला ही बाब चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूनेही अनेक रुग्णांना गाठले असून, २३ दिवसात १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांसह खासगी कोविड रुग्णालयांमध्येही मृत्यूची कमी झालेली नाही.

उपचार घेण्यात विलंब

अनेक लोक कोरोनाची लक्षणे असूनही कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यापेक्षा एकतर घरगुती किंवा ओळखीच्या डॉक्टरकडून उपचार करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे आजार बळावतो आणि ज्यावेळी अधिक त्रास होऊन ऑक्सिजन पातळी कमी व्हायला सुरुवात होते. त्यावेळी घरातील लोक धावपळ करुन कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करतात. मात्र, त्यावेळी फार उशिर झालेला असतो. असे जिल्ह्यात अनेक रुग्णांबाबत घडले आहे.

इतर आजारांकडे दुर्लक्ष

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत केवळ कोरोनाच्याच उपचाराला प्राधान्य दिले जाते. त्यात त्या रुग्णाच्या हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दुर्धर आजारांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय, असा प्रश्न नातेवाईकांच्या मनात आहे. कोरोना झालेले अनेक रुग्ण इतर आजारामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

कोरोनाच्या भीतीने मृत्यू

कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होण्यामागे हे एक मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झाला आहे, याची प्रचंड भीती रुग्ण मनात बाळगतात आणि त्यामुळे त्यांचे जगण्याचे मानसिक बळ कमी होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे घाबरुन रुग्ण पळून जाण्याच्या प्रकार त्यातूनच घडत आहेत. कोरोनाबद्दलच्या या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मानसिक दडपणकोरोनाची भीती आणि त्यातून येणारे मानसिक दडपण, हेही काही लोकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. रत्नागिरीतील महिला कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने हाताची नस कापून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेचच आवश्यक ते उपाय करण्यात आले. त्याचे वारंवार समुपदेशन करण्यात आले. मात्र तरीही त्या व्यक्तीचे मानसिक दडपण कमी झाले नाही आणि त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

डर के आगे जीत है

कोरोना झाल्यानंतरही त्यातून हजारो, लाखो लोक बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी, खासगी उपचार यंत्रणा अधिक गंभीर आहेत. गांभीर्याने उपचार त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांनी मनातून भीती काढून टाकावी. रुग्ण मानसिकदृष्ट्या जितके सक्षम असतील तितके लवकर ते बरे होतील, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.