शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर आजार यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात तब्बल १५२ रुग्णांचा बळी गेला असून, स्मशानभूमीमध्ये एकापाठोपाठ एक असे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन लढण्यानेच जगण्याची शाश्वती वाढणार असल्याने आरोग्य यंत्रणाही आता रुक्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सारे काही आटोक्यात येत आहे, असे वातावरण गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तयार झाले होते. मात्र मार्च महिन्यापासून साऱ्याचा नूर पालटला आहे. एका बाजूला कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला अचानक मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी ८ एप्रिल रोजी घेतला. हा रुग्ण परदेशातून खेड तालुक्यातील अलसुरे गावात आला होता. त्यानंतर वर्षभरात आतापर्यंत ५२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ४६ झाली असून, १२ हजार ८२२ रुग्ण बरे झाले आहेत. तकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

एप्रिल, २०२१ मध्ये २३ दिवसांत ७०१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केला ही बाब चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूनेही अनेक रुग्णांना गाठले असून, २३ दिवसात १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांसह खासगी कोविड रुग्णालयांमध्येही मृत्यूची कमी झालेली नाही.

उपचार घेण्यात विलंब

अनेक लोक कोरोनाची लक्षणे असूनही कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यापेक्षा एकतर घरगुती किंवा ओळखीच्या डॉक्टरकडून उपचार करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे आजार बळावतो आणि ज्यावेळी अधिक त्रास होऊन ऑक्सिजन पातळी कमी व्हायला सुरुवात होते. त्यावेळी घरातील लोक धावपळ करुन कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करतात. मात्र, त्यावेळी फार उशिर झालेला असतो. असे जिल्ह्यात अनेक रुग्णांबाबत घडले आहे.

इतर आजारांकडे दुर्लक्ष

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत केवळ कोरोनाच्याच उपचाराला प्राधान्य दिले जाते. त्यात त्या रुग्णाच्या हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दुर्धर आजारांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय, असा प्रश्न नातेवाईकांच्या मनात आहे. कोरोना झालेले अनेक रुग्ण इतर आजारामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

कोरोनाच्या भीतीने मृत्यू

कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होण्यामागे हे एक मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झाला आहे, याची प्रचंड भीती रुग्ण मनात बाळगतात आणि त्यामुळे त्यांचे जगण्याचे मानसिक बळ कमी होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे घाबरुन रुग्ण पळून जाण्याच्या प्रकार त्यातूनच घडत आहेत. कोरोनाबद्दलच्या या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मानसिक दडपणकोरोनाची भीती आणि त्यातून येणारे मानसिक दडपण, हेही काही लोकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. रत्नागिरीतील महिला कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने हाताची नस कापून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेचच आवश्यक ते उपाय करण्यात आले. त्याचे वारंवार समुपदेशन करण्यात आले. मात्र तरीही त्या व्यक्तीचे मानसिक दडपण कमी झाले नाही आणि त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

डर के आगे जीत है

कोरोना झाल्यानंतरही त्यातून हजारो, लाखो लोक बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी, खासगी उपचार यंत्रणा अधिक गंभीर आहेत. गांभीर्याने उपचार त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांनी मनातून भीती काढून टाकावी. रुग्ण मानसिकदृष्ट्या जितके सक्षम असतील तितके लवकर ते बरे होतील, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.