शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

बटाट्याच्या दरात घसरण मात्र टोमॅटोचे दरात वाढ, ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कांदा-बटाट्याचे दरात घसरण झाली आहे. बटाटा शंभर रूपयास पाच किलो तर कांदा शंभर रूपयास चार किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र लसूण शंभर रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

टोमॅटो ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून अन्य भाज्या ७० ते ८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पालेभाज्यांची जुडी १५ ते २० रूपये किलो दराने सुरू आहे. परजिल्ह्यातील शेतकरी भाज्या, कांदा-बटाटा, आंबा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. डाळी- कडधान्यांचे मात्र गगनाला भिडले असून सूर्यफूल १८० रूपये लीटर दराने विक्री सुरू आहे. महागाईने सामान्य ग्राहक मात्र पोळत आहेत. भाज्यांच्या दरावर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे. श्रावणात, भाज्यांची तसे फळभाज्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. व्रतवैकल्यांच्या महिना म्हणून श्रावण ओळखला जात असल्याने भाज्यांना मागणी जास्त असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्यांचे उत्पादन सुरू झाले असल्याने आवक सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रात शहरात ग्रामीण भागातून शेतकरी भाज्या घेऊन येत असून विक्रेते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मुळा, पालक, माठ, चवळी, मेथी आदी प्रकारच्या भाज्या विक्रीला येत असून कोथिंबीरही विक्रीला उपलब्ध आहे.

परराज्यातून आंबा बाजारात विक्रीसाठी येत असून मागणीही वाढती आहे. बदामी, लंगडा, दशहरी, बलसाड आदी प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. १०० ते १८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

बाजारात अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३० ते ४० रूपये नग दराने विक्री सुरू असून शंभर रूपयांना पाच नग दराने विक्री करण्यात येत आहे. अननसाचा हंगाम असलेल्या पिकलेल्या तसेच कच्च्या अननसासाठी विशेष मागणी होत आहे.

कांदा, बटाटा, लसणाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून विक्रीसाठी गावोगावी हिंडत असून कमी दरात प्राप्त होत असलेल्या कांदा, बटाटा, लसणाला मागणी वाढती आहे. दर किफायतशीर असल्याने परवडत आहेत. मात्र स्थानिक बाजारात त्याच्या किमती अधिक आहेत. आठवड्याला विक्रेते येत असल्याने खरेदी सोपी होत आहे.

- अंकिता पवार, गृहिणी

महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. डाळी, कडधान्यांसह भाजीपाला दरातील सातत्याने होणारी वाढ याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे. दररोजचा डाळभात तरी किफायतशीर दरात उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. इंधनवाढीनंतर होणारी दरवाढ रोखण्याची आवश्यकता आहे.

- प्रभा देसाई, गृहिणी