शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याच्या दरात घसरण मात्र टोमॅटोचे दरात वाढ, ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कांदा-बटाट्याचे दरात घसरण झाली आहे. बटाटा शंभर रूपयास पाच किलो तर कांदा शंभर रूपयास चार किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र लसूण शंभर रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

टोमॅटो ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून अन्य भाज्या ७० ते ८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पालेभाज्यांची जुडी १५ ते २० रूपये किलो दराने सुरू आहे. परजिल्ह्यातील शेतकरी भाज्या, कांदा-बटाटा, आंबा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. डाळी- कडधान्यांचे मात्र गगनाला भिडले असून सूर्यफूल १८० रूपये लीटर दराने विक्री सुरू आहे. महागाईने सामान्य ग्राहक मात्र पोळत आहेत. भाज्यांच्या दरावर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे. श्रावणात, भाज्यांची तसे फळभाज्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. व्रतवैकल्यांच्या महिना म्हणून श्रावण ओळखला जात असल्याने भाज्यांना मागणी जास्त असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्यांचे उत्पादन सुरू झाले असल्याने आवक सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रात शहरात ग्रामीण भागातून शेतकरी भाज्या घेऊन येत असून विक्रेते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मुळा, पालक, माठ, चवळी, मेथी आदी प्रकारच्या भाज्या विक्रीला येत असून कोथिंबीरही विक्रीला उपलब्ध आहे.

परराज्यातून आंबा बाजारात विक्रीसाठी येत असून मागणीही वाढती आहे. बदामी, लंगडा, दशहरी, बलसाड आदी प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. १०० ते १८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

बाजारात अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३० ते ४० रूपये नग दराने विक्री सुरू असून शंभर रूपयांना पाच नग दराने विक्री करण्यात येत आहे. अननसाचा हंगाम असलेल्या पिकलेल्या तसेच कच्च्या अननसासाठी विशेष मागणी होत आहे.

कांदा, बटाटा, लसणाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून विक्रीसाठी गावोगावी हिंडत असून कमी दरात प्राप्त होत असलेल्या कांदा, बटाटा, लसणाला मागणी वाढती आहे. दर किफायतशीर असल्याने परवडत आहेत. मात्र स्थानिक बाजारात त्याच्या किमती अधिक आहेत. आठवड्याला विक्रेते येत असल्याने खरेदी सोपी होत आहे.

- अंकिता पवार, गृहिणी

महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. डाळी, कडधान्यांसह भाजीपाला दरातील सातत्याने होणारी वाढ याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे. दररोजचा डाळभात तरी किफायतशीर दरात उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. इंधनवाढीनंतर होणारी दरवाढ रोखण्याची आवश्यकता आहे.

- प्रभा देसाई, गृहिणी