शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

बटाट्याच्या दरात घसरण मात्र टोमॅटोचे दरात वाढ, ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कांदा-बटाट्याचे दरात घसरण झाली आहे. बटाटा शंभर रूपयास पाच किलो तर कांदा शंभर रूपयास चार किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र लसूण शंभर रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

टोमॅटो ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून अन्य भाज्या ७० ते ८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पालेभाज्यांची जुडी १५ ते २० रूपये किलो दराने सुरू आहे. परजिल्ह्यातील शेतकरी भाज्या, कांदा-बटाटा, आंबा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. डाळी- कडधान्यांचे मात्र गगनाला भिडले असून सूर्यफूल १८० रूपये लीटर दराने विक्री सुरू आहे. महागाईने सामान्य ग्राहक मात्र पोळत आहेत. भाज्यांच्या दरावर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे. श्रावणात, भाज्यांची तसे फळभाज्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. व्रतवैकल्यांच्या महिना म्हणून श्रावण ओळखला जात असल्याने भाज्यांना मागणी जास्त असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्यांचे उत्पादन सुरू झाले असल्याने आवक सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रात शहरात ग्रामीण भागातून शेतकरी भाज्या घेऊन येत असून विक्रेते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मुळा, पालक, माठ, चवळी, मेथी आदी प्रकारच्या भाज्या विक्रीला येत असून कोथिंबीरही विक्रीला उपलब्ध आहे.

परराज्यातून आंबा बाजारात विक्रीसाठी येत असून मागणीही वाढती आहे. बदामी, लंगडा, दशहरी, बलसाड आदी प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. १०० ते १८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.

बाजारात अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३० ते ४० रूपये नग दराने विक्री सुरू असून शंभर रूपयांना पाच नग दराने विक्री करण्यात येत आहे. अननसाचा हंगाम असलेल्या पिकलेल्या तसेच कच्च्या अननसासाठी विशेष मागणी होत आहे.

कांदा, बटाटा, लसणाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून विक्रीसाठी गावोगावी हिंडत असून कमी दरात प्राप्त होत असलेल्या कांदा, बटाटा, लसणाला मागणी वाढती आहे. दर किफायतशीर असल्याने परवडत आहेत. मात्र स्थानिक बाजारात त्याच्या किमती अधिक आहेत. आठवड्याला विक्रेते येत असल्याने खरेदी सोपी होत आहे.

- अंकिता पवार, गृहिणी

महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. डाळी, कडधान्यांसह भाजीपाला दरातील सातत्याने होणारी वाढ याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे. दररोजचा डाळभात तरी किफायतशीर दरात उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. इंधनवाढीनंतर होणारी दरवाढ रोखण्याची आवश्यकता आहे.

- प्रभा देसाई, गृहिणी