शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

फाटली जाळी अन खिसाही!

By admin | Updated: January 14, 2015 00:41 IST

वाऱ्यामुळे मासे किनाऱ्यावर : गाळाने मच्छिमारांचा घास हिरावला...

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे थंडीचा कडाका वाढतो आहे. याच कालावधीत मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु सागरी किनारे गाळाने भरलेले असल्याने, त्यात जाळी फाटून नौका मालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. जाळ्यांच्या किमती लाखांमध्ये असल्याने संबंधित मच्छिमारांचे नुकसान होत आहे. या जाळ्यांबरोबरच खिशालाही चाट बसत आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीअखेर वारे उत्तरेकडून वाहत असल्याने, वाऱ्याला वेग अधिक असतो. शिवाय समुद्रातील लाटांनाही विशिष्ट प्रकारचा करंट असतो. त्यामुळे मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु किनाऱ्यावरील गाळ उपसा होत नसल्यामुळे, जाळी चिखलात अडकून फाटतात. जाळ्यांच्या किमती ७ ते २५ लाखांच्या आसपास आहेत. एक जाळे फाटले, तर दुरूस्तीकरिता चार ते पाच दिवस सहज जातात. परंतु त्याकरिता २० ते २५ कारागिर जाळी दुरूस्तीकरिता बसवावे लागतात. जाळी विणणाऱ्या कारागिरांची दिवसाची मजुरी ४०० रूपये आहे. कारागिरांची मजुरीच दिवसाला ८ ते १० हजार इतकी होते. त्यामुळे जाळी दुरूस्तीकरिता किमान ४० ते ५० हजार रूपये खर्च सहज येतो. मात्र, त्या मानाने मासे मिळत नसल्याने, मच्छिमारांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आधीच वातावरणात कायम बदल होत असल्याने, मच्छिमारीवर परिणाम होत असताना आता ही नवीन समस्या भेडसावू लागली आहे.वाऱ्याच्या वेगामुळे खोल समुद्रात नौका घालण्यास मच्छिमार धजावत नाहीत. शिवाय माशांचे उत्पादन या काळात कमी असल्याने खलाशी पगार, इंधनखर्च, देखभाल दुरूस्ती खर्च, बर्फ यामुळे मच्छिमारांचा खर्च वसूल होत नाही. शिवाय जाळी फाटल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. - शब्बीर होडेकर,उपाध्यक्ष मिरकरवाडा आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटी.उत्पादन मेट्रीक टनमध्येवर्षउत्पन्न२००५-०६१,०५,०६९२००६-०७१,०९,०५५२००७-०८८५,०९९२००८-०९७२,१२२२००९-१०७५,१२२२०१०-११९५,९५०२०११-१२८८,४३८२०१२-१३ ८७,६९०२०१३-१४१,०६,६५२