शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात प्रथमच न झालेले नुकसान अनुभवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

संदीप बांद्रे चिपळूण : चिपळूण शहर परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५चा महापूर ...

संदीप बांद्रे

चिपळूण : चिपळूण शहर परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५चा महापूर असो. त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे व विकासकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते; परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात महापुरामुळे आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान आज अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला.

तिवरे येथे २०१९ मध्ये धरणफुटीची घटना घडली होती. त्यावेळी आलेला अनुभव प्रशासनाकडे होता; परंतु तो अनुभव या ढगफुटीत जराही कामी आला नाही. बुधवारी रात्री खऱ्याअर्थाने आठ वाजल्यापासून बाजारपेठेत पुराचे पाणी भरायला लागले होते. बाजारपेठेतील जयंत साडी सेंटर येथे तेव्हा पाणी आले होते. त्यामुळे बाजारपुलाचा मार्ग बंद पडला होता व अनेक जण उक्ताडमार्गे पलीकडे जात होते. यावेळी काही व्यापारी व कामगार दुकाने बंद करून घरी निघाले होते. त्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत चिंचनाका व संपूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याचे समजले. मात्र, त्यानंतर पुराच्या पाण्याचा वेग वाढला आणि पहाटे चार वाजता नगर परिषदेने भोंगा चारवेळा वाजवून नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे मलाही धडकी भरली. कारण माझी आई वडनाका येथील जनता हॉस्पिटलमध्ये अडकली होती. तेवढ्यात तिचा फोन आला की पाणी वाढतंय, कोणी घराबाहेर पडू नका. त्यावेळी माझ्या गावातील गोवळकोट शिंदेवाडी येथे जाऊन पाहिले तर संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती; परंतु हा अनुभव नवीन नव्हता. क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे मी काही सहकाऱ्यांना संपर्क साधला असता, कोयनेचे अवजल सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजता पुन्हा पाण्याची पातळी पाहिली असता २००५ची पूररेषा ओलांडली हाेती. मी तत्काळ तहसीलदारांना संपर्क साधला आणि एनडीआरएफची टीम आली का, गोवळकोटमध्ये बोटीची गरज आहे, तळ शेतात ३५ जण अडकले आहेत व अनेक जनावरांचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. याचवेळी पेढे कुंभारवाडी येथे दरडीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची माहिती कळली. मात्र, त्यानंतर काही वेळाने मोबाइल नेटवर्कच गायब झाले. त्यातच गोवळकोट रोड येथे दोन जुनाट वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गावाचा चिपळूण शहराशी संपूर्ण संपर्क तुटला. यावेळी काही कामगार कामावर निघाले होते; परंतु रस्त्यावर सहा फुटापर्यंत पाणी होते त्यामुळे ते मागे फिरले. दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याची पातळी स्थिर होती. त्यानंतर दीड ते दोन फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. परंतु, पुन्हा पातळी वाढली. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी एका छोट्या बोटीच्या साहाय्याने अक्षरशः जीव धोक्यात घालून ३५ जणांना पुरातून बाहेर काढले. तसेच तीन बंगल्यांतील १७ जण, काही कामगारांना रात्री उशिरा बाहेर काढले. हा थरारक अनुभव घेताना अंगावर शहारे येण्यापलीकडे काही नव्हते. त्यानंतर रात्री १ वाजता अचानक चार फुटाने पाण्याची पातळी वाढली आणि रात्रीच सर्वत्र हाहाकार माजला.

गावातील शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच महापुरात बुडालेल्या गोठ्यांकडे नजरा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकरी माझ्या घरी आले आणि जनावरांचे काय करायचे, असा सवाल केला. ते ऐकून मीही गहिवरून गेलो. यावेळी काहींनी २४ तास होऊन गेल्याने पंचनाम्याची वाट न पाहता, पुराचे पाणी काही प्रमाणात कमी होताच पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून ५० हून अधिक जनावर, शेकडो बकऱ्या पुरात सोडून दिल्या. त्यानंतर काही वेळातच गोवळकोट परिसरातील व शहरातील पुराचे पाणी निघून गेले. मात्र त्यानंतर उरला होता तो केवळ चिखल.