शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

इतिहासात प्रथमच न झालेले नुकसान अनुभवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

संदीप बांद्रे चिपळूण : चिपळूण शहर परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५चा महापूर ...

संदीप बांद्रे

चिपळूण : चिपळूण शहर परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५चा महापूर असो. त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे व विकासकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते; परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात महापुरामुळे आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान आज अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला.

तिवरे येथे २०१९ मध्ये धरणफुटीची घटना घडली होती. त्यावेळी आलेला अनुभव प्रशासनाकडे होता; परंतु तो अनुभव या ढगफुटीत जराही कामी आला नाही. बुधवारी रात्री खऱ्याअर्थाने आठ वाजल्यापासून बाजारपेठेत पुराचे पाणी भरायला लागले होते. बाजारपेठेतील जयंत साडी सेंटर येथे तेव्हा पाणी आले होते. त्यामुळे बाजारपुलाचा मार्ग बंद पडला होता व अनेक जण उक्ताडमार्गे पलीकडे जात होते. यावेळी काही व्यापारी व कामगार दुकाने बंद करून घरी निघाले होते. त्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत चिंचनाका व संपूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याचे समजले. मात्र, त्यानंतर पुराच्या पाण्याचा वेग वाढला आणि पहाटे चार वाजता नगर परिषदेने भोंगा चारवेळा वाजवून नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे मलाही धडकी भरली. कारण माझी आई वडनाका येथील जनता हॉस्पिटलमध्ये अडकली होती. तेवढ्यात तिचा फोन आला की पाणी वाढतंय, कोणी घराबाहेर पडू नका. त्यावेळी माझ्या गावातील गोवळकोट शिंदेवाडी येथे जाऊन पाहिले तर संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती; परंतु हा अनुभव नवीन नव्हता. क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे मी काही सहकाऱ्यांना संपर्क साधला असता, कोयनेचे अवजल सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजता पुन्हा पाण्याची पातळी पाहिली असता २००५ची पूररेषा ओलांडली हाेती. मी तत्काळ तहसीलदारांना संपर्क साधला आणि एनडीआरएफची टीम आली का, गोवळकोटमध्ये बोटीची गरज आहे, तळ शेतात ३५ जण अडकले आहेत व अनेक जनावरांचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. याचवेळी पेढे कुंभारवाडी येथे दरडीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची माहिती कळली. मात्र, त्यानंतर काही वेळाने मोबाइल नेटवर्कच गायब झाले. त्यातच गोवळकोट रोड येथे दोन जुनाट वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गावाचा चिपळूण शहराशी संपूर्ण संपर्क तुटला. यावेळी काही कामगार कामावर निघाले होते; परंतु रस्त्यावर सहा फुटापर्यंत पाणी होते त्यामुळे ते मागे फिरले. दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याची पातळी स्थिर होती. त्यानंतर दीड ते दोन फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. परंतु, पुन्हा पातळी वाढली. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी एका छोट्या बोटीच्या साहाय्याने अक्षरशः जीव धोक्यात घालून ३५ जणांना पुरातून बाहेर काढले. तसेच तीन बंगल्यांतील १७ जण, काही कामगारांना रात्री उशिरा बाहेर काढले. हा थरारक अनुभव घेताना अंगावर शहारे येण्यापलीकडे काही नव्हते. त्यानंतर रात्री १ वाजता अचानक चार फुटाने पाण्याची पातळी वाढली आणि रात्रीच सर्वत्र हाहाकार माजला.

गावातील शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच महापुरात बुडालेल्या गोठ्यांकडे नजरा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकरी माझ्या घरी आले आणि जनावरांचे काय करायचे, असा सवाल केला. ते ऐकून मीही गहिवरून गेलो. यावेळी काहींनी २४ तास होऊन गेल्याने पंचनाम्याची वाट न पाहता, पुराचे पाणी काही प्रमाणात कमी होताच पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून ५० हून अधिक जनावर, शेकडो बकऱ्या पुरात सोडून दिल्या. त्यानंतर काही वेळातच गोवळकोट परिसरातील व शहरातील पुराचे पाणी निघून गेले. मात्र त्यानंतर उरला होता तो केवळ चिखल.