शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वृक्षताेडीमुळे वीज पडण्याचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ यामध्ये बळी जाण्याच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेकणातील डाेंगर आणि वनसंपदेमुळे या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पुणे येथील आयआयटीएमचे डाॅ़ सुनील पवार यांनी दिली़

इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटीतर्फे पत्रकारांसाठी ‘हवामानशास्त्र आणि हवामान सेवांमध्ये अलीकडील प्रगती’ यावर तीन दिवसीय ई-कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यशाळेत सुनील पवार यांनी माहिती दिली. या कार्यशाळेला डाॅ. के. एस. हाेसाळीकर, नीलेश वाघ, डाॅ. सचिन घुडे, डाॅ. ए. के. सहाई, शुभांगी भुते, डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला हाेता. यावेळी डाॅ. पवार यांनी सांगितले की, ढगांमध्ये आणि थेट जमिनीवर वीज पडते. वर्षभरात जेवढी वीज एका घरात वापरली जाते तेवढी क्षमता आकाशातून काेसळणाऱ्या विजेच्या एका झटक्यामध्ये असते. वीज पडून जगभरात तब्बल २०,००० लाेक मृत्युमुखी पडतात, असे पवार यांनी सांगितले.

उंच झाड, टाॅवर आणि टेकडी या ठिकाणी वीज पडते. सध्या जंगलाचा माेठ्या प्रमाणात हाेणारा ऱ्हास यामुळे वीज थेट जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत काेकणात असणारे डाेंगर, जंगल यामुळे वीज पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.

--------------------------

‘दामिनी ॲप’ देणार माहिती

हवामान खात्याने विजांची माहिती मिळण्यासाठी ‘दामिनी ॲप’ तयार केले आहे. या ॲपद्वारे वीज काेठे पडते, वीज पडल्यावर कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली जाते. हे ॲप २० ते ४० किलाेमीटर अंतरावर वीज पडण्याचा धाेका असल्यास माहिती देते. या ॲपमध्ये अजून काम सुरू असून, त्याद्वारे वीज पडण्याआधी ३० मिनिटे आधी माहिती मिळणे शक्य हाेणार आहे.

-------------

दुपारच्या वेळेत वीज पडण्याचे प्रकार अधिक

महाराष्ट्रात दुपारी १-२ वाजल्यानंतर वीज पडण्यास सुरुवात हाेते. त्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. याच काळात फिरतीवर असणारे नागरिक, कार्यालयातून बाहेर पडणारे नागरिक यांना जास्त धाेका संभवताे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वीज पडून मृत्यू हाेण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे. याचे कारण बाहेर काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

--------------------------

काेणती काळजी घ्यावी?

वीज पडत असल्याचे कळल्यास माेकळ्या जागेत राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये, त्याऐवजी झाडापासून ५ ते ६ फुटांच्या अंतरावर बसून राहावे म्हणजे धाेका पाेहाेचणार नाही. झाडाखाली उभे राहिल्यास वीज थेट झाडाच्या फांदीवर पडून माणसाच्या अंगावर पडू शकते. चालताना दाेन्ही पायांमध्ये अंतर ठेवू नये.