शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

बेसुमार वृक्षताेडीमुळे वीज पडण्याचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ यामध्ये बळी जाण्याच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेकणातील डाेंगर आणि वनसंपदेमुळे या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पुणे येथील आयआयटीएमचे डाॅ़ सुनील पवार यांनी दिली़

इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटीतर्फे पत्रकारांसाठी ‘हवामानशास्त्र आणि हवामान सेवांमध्ये अलीकडील प्रगती’ यावर तीन दिवसीय ई-कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यशाळेत सुनील पवार यांनी माहिती दिली. या कार्यशाळेला डाॅ. के. एस. हाेसाळीकर, नीलेश वाघ, डाॅ. सचिन घुडे, डाॅ. ए. के. सहाई, शुभांगी भुते, डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला हाेता. यावेळी डाॅ. पवार यांनी सांगितले की, ढगांमध्ये आणि थेट जमिनीवर वीज पडते. वर्षभरात जेवढी वीज एका घरात वापरली जाते तेवढी क्षमता आकाशातून काेसळणाऱ्या विजेच्या एका झटक्यामध्ये असते. वीज पडून जगभरात तब्बल २०,००० लाेक मृत्युमुखी पडतात, असे पवार यांनी सांगितले.

उंच झाड, टाॅवर आणि टेकडी या ठिकाणी वीज पडते. सध्या जंगलाचा माेठ्या प्रमाणात हाेणारा ऱ्हास यामुळे वीज थेट जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत काेकणात असणारे डाेंगर, जंगल यामुळे वीज पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.

--------------------------

‘दामिनी ॲप’ देणार माहिती

हवामान खात्याने विजांची माहिती मिळण्यासाठी ‘दामिनी ॲप’ तयार केले आहे. या ॲपद्वारे वीज काेठे पडते, वीज पडल्यावर कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली जाते. हे ॲप २० ते ४० किलाेमीटर अंतरावर वीज पडण्याचा धाेका असल्यास माहिती देते. या ॲपमध्ये अजून काम सुरू असून, त्याद्वारे वीज पडण्याआधी ३० मिनिटे आधी माहिती मिळणे शक्य हाेणार आहे.

-------------

दुपारच्या वेळेत वीज पडण्याचे प्रकार अधिक

महाराष्ट्रात दुपारी १-२ वाजल्यानंतर वीज पडण्यास सुरुवात हाेते. त्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. याच काळात फिरतीवर असणारे नागरिक, कार्यालयातून बाहेर पडणारे नागरिक यांना जास्त धाेका संभवताे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वीज पडून मृत्यू हाेण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे. याचे कारण बाहेर काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

--------------------------

काेणती काळजी घ्यावी?

वीज पडत असल्याचे कळल्यास माेकळ्या जागेत राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये, त्याऐवजी झाडापासून ५ ते ६ फुटांच्या अंतरावर बसून राहावे म्हणजे धाेका पाेहाेचणार नाही. झाडाखाली उभे राहिल्यास वीज थेट झाडाच्या फांदीवर पडून माणसाच्या अंगावर पडू शकते. चालताना दाेन्ही पायांमध्ये अंतर ठेवू नये.