शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

बेसुमार वृक्षताेडीमुळे वीज पडण्याचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्रात झपाट्याने कमी हाेणाऱ्या जंगलांमुळे, बेसुमार वृक्षताेडीमुळे थेट जमिनीवर वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे़ यामध्ये बळी जाण्याच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे़ राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेकणातील डाेंगर आणि वनसंपदेमुळे या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पुणे येथील आयआयटीएमचे डाॅ़ सुनील पवार यांनी दिली़

इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटीतर्फे पत्रकारांसाठी ‘हवामानशास्त्र आणि हवामान सेवांमध्ये अलीकडील प्रगती’ यावर तीन दिवसीय ई-कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यशाळेत सुनील पवार यांनी माहिती दिली. या कार्यशाळेला डाॅ. के. एस. हाेसाळीकर, नीलेश वाघ, डाॅ. सचिन घुडे, डाॅ. ए. के. सहाई, शुभांगी भुते, डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला हाेता. यावेळी डाॅ. पवार यांनी सांगितले की, ढगांमध्ये आणि थेट जमिनीवर वीज पडते. वर्षभरात जेवढी वीज एका घरात वापरली जाते तेवढी क्षमता आकाशातून काेसळणाऱ्या विजेच्या एका झटक्यामध्ये असते. वीज पडून जगभरात तब्बल २०,००० लाेक मृत्युमुखी पडतात, असे पवार यांनी सांगितले.

उंच झाड, टाॅवर आणि टेकडी या ठिकाणी वीज पडते. सध्या जंगलाचा माेठ्या प्रमाणात हाेणारा ऱ्हास यामुळे वीज थेट जमिनीवर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत काेकणात असणारे डाेंगर, जंगल यामुळे वीज पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.

--------------------------

‘दामिनी ॲप’ देणार माहिती

हवामान खात्याने विजांची माहिती मिळण्यासाठी ‘दामिनी ॲप’ तयार केले आहे. या ॲपद्वारे वीज काेठे पडते, वीज पडल्यावर कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली जाते. हे ॲप २० ते ४० किलाेमीटर अंतरावर वीज पडण्याचा धाेका असल्यास माहिती देते. या ॲपमध्ये अजून काम सुरू असून, त्याद्वारे वीज पडण्याआधी ३० मिनिटे आधी माहिती मिळणे शक्य हाेणार आहे.

-------------

दुपारच्या वेळेत वीज पडण्याचे प्रकार अधिक

महाराष्ट्रात दुपारी १-२ वाजल्यानंतर वीज पडण्यास सुरुवात हाेते. त्यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान हे प्रमाण वाढते. याच काळात फिरतीवर असणारे नागरिक, कार्यालयातून बाहेर पडणारे नागरिक यांना जास्त धाेका संभवताे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वीज पडून मृत्यू हाेण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे. याचे कारण बाहेर काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

--------------------------

काेणती काळजी घ्यावी?

वीज पडत असल्याचे कळल्यास माेकळ्या जागेत राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये, त्याऐवजी झाडापासून ५ ते ६ फुटांच्या अंतरावर बसून राहावे म्हणजे धाेका पाेहाेचणार नाही. झाडाखाली उभे राहिल्यास वीज थेट झाडाच्या फांदीवर पडून माणसाच्या अंगावर पडू शकते. चालताना दाेन्ही पायांमध्ये अंतर ठेवू नये.