शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

परीक्षा शुल्क पद्धतीचा अवलंब करू नये : समविचारी मंचची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

रत्नागिरी : कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षा हा राज्यभरातील विद्यापीठांनी पर्याय स्वीकारलेला असताना, सर्व विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारत आहेत, ...

रत्नागिरी : कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षा हा राज्यभरातील विद्यापीठांनी पर्याय स्वीकारलेला असताना, सर्व विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारत आहेत, हे अन्यायकारक असून, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनी याबाबतीत विचार करून परीक्षा शुल्क पद्धतीचा अवलंब करू नये, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने केली आहे.

याबाबत समविचारीचे बाबा ढोल्ये, महासचिव श्रीनिवास दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य महिला संघटक ॲड. सोनाली कासार, राज्य संघटक ॲड. ओवेस पेचकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवाध्यक्ष नीलेश आखाडे आदींनी याप्रश्नी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे लक्ष वेधले आहे.

समविचारीच्या म्हणण्यानुसार गेली दीड वर्षे कोरोनाच्यानिमित्ताने लोकांची आर्थिक स्थिती ढासळलेली असून, मानसिक खच्चीकरण सुरू आहे. राज्यात असंख्य पालक यातून जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बहुतेक विद्यापीठांनी आणि संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा हा पर्याय स्वीकारलेला असून, त्याला अनुसरून राज्यभरात सुरळीत परीक्षा पार पडत आहेत.

परीक्षा प्रणाली ऑनलाईन होऊनसुद्धा संबंधित विद्यापीठ मात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारत आहेत, हे अयोग्य असून, विद्यापीठांनी असे शुल्क आकारू नये, अशी मागणी समविचारीने केली आहे. प्रत्यक्षात होणाऱ्या परीक्षांवेळी जो खर्च होतो, तो ऑनलाईन परीक्षांच्या माध्यमातून वाचणार आहे. प्रश्न-उत्तरपत्रिका, परीक्षा केंद्रे, सुरक्षितता, सुपरवायझर, केंद्रावरील कर्मचारी, अधिकारी, वाहने या आणि असा तत्सम् खर्च विद्यापीठ परीक्षा विभागाला येत नसल्याने विद्यापीठांनी या सर्वाचा साकल्याने विचार करून परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये आणि घेतले असल्यास परत करावे, असे आवाहन समविचारी मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

याविषयीचे सविस्तर म्हणणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, राज्यातील अनेक संघटनांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत समविचारी मंचचा समावेश केला आहे.