शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द झाली, शुल्काबाबत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कोकण विभागीय मंडळाकडे १ कोटी २२ लाख ९४ हजार ४८० रुपये परीक्षा शुल्क जमा असून, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय शासनाने जाहीर केलेला नाही.

कोरोनामुळे गतवर्षी जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले. मात्र, ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले; परंतु कोरोना रुग्णसंख्येतील सातत्यपूर्ण वाढीमुळे परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. ऑफलाइन परीक्षा घेणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असल्याने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंतर्गत मूल्यमापनावरून मुलांना सरसकट पास करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून बारावीसाठी एकूण १८ हजार ८५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. ४४० प्रमाणे परीक्षा शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यास आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे; परंतु परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत अद्याप काहीच सूचना नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७९ लाख ५७ हजार ४०० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार लाख ३३ हजार ७ हजार ८० रुपये परीक्षा शुल्क आहे. परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बारावीचा निकाल तयार करताना दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा याबाबत अद्याप विचार विनिमय सुरू आहे. मात्र, ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोट घ्यावा

शासनाने ऐनवेळी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. त्याचवेळी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेता आल्या असत्या. मात्र, परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षा शुल्क परत करावे.

- विजय रामाणी, पालक

कोट घ्यावा

बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. निकाल तयार करण्याबाबत शासनाकडून अद्याप तरी काहीच सूचना नाहीत. शासनाच्या सूचनांची प्रतीक्षा असून, प्राप्त सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

- एस. व्ही. पाटील, प्राचार्य, माँसाहेब मीनातार्ई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, नेवरे

कोट

शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, निकालाबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयांना पाठविण्यात येणार आहेत. परीक्षा शुल्क रद्द करण्याबाबत मात्र कोणताच निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

जिल्हा मुले मुली एकूण

रत्नागिरी ९२५२ ८८३३ १८०८५

सिंधुदुर्ग ५०७३ ४७८४ ९८५७