शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

महोत्सवासाठी सर्वांचे सहकार्य हवे

By admin | Updated: April 23, 2016 00:28 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरी पर्यटन महोत्सव नियोजनाबाबत चिपळूण येथे बैठक

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने घेण्यात येणारा रत्नागिरी पर्यटन महोत्सव यावर्षी चिपळूण शहरातील पवन तलाव येथे ७ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. यावेळी कोकणातील विविध पैलूंचे दर्शन घडविले जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी एका मतदारसंघात करण्याचे नियोजन आहे. गेल्यावर्षी रत्नागिरीत झाला, तर यावर्षी तो चिपळूणमध्ये होत आहे. आमदार सदानंद चव्हाण व उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला उत्सव समजून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री वायकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्य कार्यकारी अधिकारी पुसाळकर, उपविभागीय अधिकारी हजारे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गुहागरचे सभापती विलास वाघे, मंडणगडचे सभापती रेवाळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवात कोकणातील कला संस्कृतीचे दर्शन, निसर्ग अभ्यास, आमराई सफर, अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स, रॉक क्लायविंग, क्रोकोडाईल सफारी, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर क्रॉसिंग, बर्मा ब्रिज, झॉरबी बॉल आदी विविध उपक्रम तसेच भविष्यातील पर्यटन विषयावर चर्चासत्र होणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात ७ मे रोजी शोभायात्रेने होईल. त्यानंतर आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व रांगोळी स्पर्धा होणार आहेत. ८ रोजी कोकणी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा, दि. ९ रोजी पुष्परचना स्पर्धा आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)