शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवासाठी सर्वांचे सहकार्य हवे

By admin | Updated: April 23, 2016 00:28 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरी पर्यटन महोत्सव नियोजनाबाबत चिपळूण येथे बैठक

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने घेण्यात येणारा रत्नागिरी पर्यटन महोत्सव यावर्षी चिपळूण शहरातील पवन तलाव येथे ७ ते ९ मे या कालावधीत होणार आहे. यावेळी कोकणातील विविध पैलूंचे दर्शन घडविले जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी एका मतदारसंघात करण्याचे नियोजन आहे. गेल्यावर्षी रत्नागिरीत झाला, तर यावर्षी तो चिपळूणमध्ये होत आहे. आमदार सदानंद चव्हाण व उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला उत्सव समजून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री वायकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्य कार्यकारी अधिकारी पुसाळकर, उपविभागीय अधिकारी हजारे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गुहागरचे सभापती विलास वाघे, मंडणगडचे सभापती रेवाळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवात कोकणातील कला संस्कृतीचे दर्शन, निसर्ग अभ्यास, आमराई सफर, अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स, रॉक क्लायविंग, क्रोकोडाईल सफारी, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, रिव्हर क्रॉसिंग, बर्मा ब्रिज, झॉरबी बॉल आदी विविध उपक्रम तसेच भविष्यातील पर्यटन विषयावर चर्चासत्र होणार आहेत. या महोत्सवाची सुरुवात ७ मे रोजी शोभायात्रेने होईल. त्यानंतर आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व रांगोळी स्पर्धा होणार आहेत. ८ रोजी कोकणी शाकाहारी व मांसाहारी पाककला स्पर्धा, दि. ९ रोजी पुष्परचना स्पर्धा आयोजित केली आहे. (प्रतिनिधी)