शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; मात्र नगर परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांची टीम अंत्यसंस्कार करीत आहे. गेल्या महिनाभरात १०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अंत्यसंस्काराचे काम सुरू असते. एकावेळी सहा लाकडावरील सरणावर व एक गॅसवरील शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. पीपीई किटमधील कर्मचाऱ्यांना उकाड्याने हैराण व्हायला होते; मात्र कर्तव्य म्हणून मंडळी अंत्यसंस्कार उरकत असतात.

अनेक रुग्णांचे नातेवाईक येतात; मात्र ते स्मशानभूमीच्या बाहेर थांबतात. आठवडाभरात मृतांची संख्या खूपच वाढली आहे. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. एक सरण रचायला किमान २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. अंत्यसंस्काराला येणारा मृतदेह प्लास्टिकमध्ये असतो; मात्र मृतदेह सरणावर ठेवण्यापासून अग्नि देण्याचे काम कर्मचारी करतात. मुस्लीम व ख्रिश्चन मृतदेहावरही त्या- त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार या टीमद्वारे करण्यात येत आहेत. काही अंत्यसंस्कारावेळी धर्मगुरू पीपीई किटमध्ये उपस्थित असतात.

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणला जातो तेव्हा नातेवाइकांचा आक्रोश, आकांत ऐकून प्रचंड वेदना होतात; मात्र दहा जणांच्या टीमला विभागणी करून आळीपाळीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. पेटलेली चिता शांत झाल्यानंतर किमान पाच तासाचा अवधी घेतला जातो. पाणी मारल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सरण रचले जाते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत काम सुरूच असते. अंत्यविधी आटोपून घरी गेल्यानंतर कर्मचारी कुटुंबात गेल्यानंतर दिवसभरातील वेदना पुसण्याचा प्रयत्न करतात.

काही वेळा मुलगा किंवा मुलगी बरोबर येण्याचा हट्ट धरतात. पीपीई किट घालूनच त्यांना स्मशानभूमीत येण्यासाठी प्रवेश दिला जातो; मात्र अग्नि देताना थरथरायला लागतात, अशावेळी शेवटी टीमपैकी कोणीतरी पुढे होऊन मदत करतो. त्यांचे दु:ख कर्मचाऱ्यांना वेदनादायक ठरते.

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मियांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी केला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योद्धे’ निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेनंतरच कुटुंबीयांमध्ये सहभागी होतात.

जितेंद्र विचारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश कदम, जोगेंद्र जाधव, प्रभाकर कांबळे, बबन बेटकर, संकेत कांबळे, रोहित आठवले, नितीन राठोड, संतोष राठोड, नरेश राठोड, सुनील माटल, हरीश जाधव आदींची दोन पथकांत विभागणी करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू असून, अंत्यसंस्कारासाठीचा सर्व खर्च नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.

कोट :

कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्‌ध्वस्थ झाली आहेत. मृतदेह घेऊन नातेवाईक येत असतात. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना आम्हालाही प्रचंड वेदना होतात. नित्य कुटुंबांचा आक्रोश, आकांत ऐकताना मानसिक त्रास होत असतो; मात्र कर्तव्यामुळे विसरून पुन्हा कामाला लागावे लागते.

जितेंद्र विचारे.