शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; मात्र नगर परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांची टीम अंत्यसंस्कार करीत आहे. गेल्या महिनाभरात १०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अंत्यसंस्काराचे काम सुरू असते. एकावेळी सहा लाकडावरील सरणावर व एक गॅसवरील शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. पीपीई किटमधील कर्मचाऱ्यांना उकाड्याने हैराण व्हायला होते; मात्र कर्तव्य म्हणून मंडळी अंत्यसंस्कार उरकत असतात.

अनेक रुग्णांचे नातेवाईक येतात; मात्र ते स्मशानभूमीच्या बाहेर थांबतात. आठवडाभरात मृतांची संख्या खूपच वाढली आहे. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. एक सरण रचायला किमान २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. अंत्यसंस्काराला येणारा मृतदेह प्लास्टिकमध्ये असतो; मात्र मृतदेह सरणावर ठेवण्यापासून अग्नि देण्याचे काम कर्मचारी करतात. मुस्लीम व ख्रिश्चन मृतदेहावरही त्या- त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार या टीमद्वारे करण्यात येत आहेत. काही अंत्यसंस्कारावेळी धर्मगुरू पीपीई किटमध्ये उपस्थित असतात.

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणला जातो तेव्हा नातेवाइकांचा आक्रोश, आकांत ऐकून प्रचंड वेदना होतात; मात्र दहा जणांच्या टीमला विभागणी करून आळीपाळीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. पेटलेली चिता शांत झाल्यानंतर किमान पाच तासाचा अवधी घेतला जातो. पाणी मारल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सरण रचले जाते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत काम सुरूच असते. अंत्यविधी आटोपून घरी गेल्यानंतर कर्मचारी कुटुंबात गेल्यानंतर दिवसभरातील वेदना पुसण्याचा प्रयत्न करतात.

काही वेळा मुलगा किंवा मुलगी बरोबर येण्याचा हट्ट धरतात. पीपीई किट घालूनच त्यांना स्मशानभूमीत येण्यासाठी प्रवेश दिला जातो; मात्र अग्नि देताना थरथरायला लागतात, अशावेळी शेवटी टीमपैकी कोणीतरी पुढे होऊन मदत करतो. त्यांचे दु:ख कर्मचाऱ्यांना वेदनादायक ठरते.

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मियांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी केला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योद्धे’ निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेनंतरच कुटुंबीयांमध्ये सहभागी होतात.

जितेंद्र विचारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश कदम, जोगेंद्र जाधव, प्रभाकर कांबळे, बबन बेटकर, संकेत कांबळे, रोहित आठवले, नितीन राठोड, संतोष राठोड, नरेश राठोड, सुनील माटल, हरीश जाधव आदींची दोन पथकांत विभागणी करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू असून, अंत्यसंस्कारासाठीचा सर्व खर्च नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.

कोट :

कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्‌ध्वस्थ झाली आहेत. मृतदेह घेऊन नातेवाईक येत असतात. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना आम्हालाही प्रचंड वेदना होतात. नित्य कुटुंबांचा आक्रोश, आकांत ऐकताना मानसिक त्रास होत असतो; मात्र कर्तव्यामुळे विसरून पुन्हा कामाला लागावे लागते.

जितेंद्र विचारे.