शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृताचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाहीत; मात्र नगर परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांची टीम अंत्यसंस्कार करीत आहे. गेल्या महिनाभरात १०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अंत्यसंस्काराचे काम सुरू असते. एकावेळी सहा लाकडावरील सरणावर व एक गॅसवरील शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. पीपीई किटमधील कर्मचाऱ्यांना उकाड्याने हैराण व्हायला होते; मात्र कर्तव्य म्हणून मंडळी अंत्यसंस्कार उरकत असतात.

अनेक रुग्णांचे नातेवाईक येतात; मात्र ते स्मशानभूमीच्या बाहेर थांबतात. आठवडाभरात मृतांची संख्या खूपच वाढली आहे. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. एक सरण रचायला किमान २० ते ३० मिनिटांचा अवधी लागतो. अंत्यसंस्काराला येणारा मृतदेह प्लास्टिकमध्ये असतो; मात्र मृतदेह सरणावर ठेवण्यापासून अग्नि देण्याचे काम कर्मचारी करतात. मुस्लीम व ख्रिश्चन मृतदेहावरही त्या- त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार या टीमद्वारे करण्यात येत आहेत. काही अंत्यसंस्कारावेळी धर्मगुरू पीपीई किटमध्ये उपस्थित असतात.

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणला जातो तेव्हा नातेवाइकांचा आक्रोश, आकांत ऐकून प्रचंड वेदना होतात; मात्र दहा जणांच्या टीमला विभागणी करून आळीपाळीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. पेटलेली चिता शांत झाल्यानंतर किमान पाच तासाचा अवधी घेतला जातो. पाणी मारल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सरण रचले जाते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत काम सुरूच असते. अंत्यविधी आटोपून घरी गेल्यानंतर कर्मचारी कुटुंबात गेल्यानंतर दिवसभरातील वेदना पुसण्याचा प्रयत्न करतात.

काही वेळा मुलगा किंवा मुलगी बरोबर येण्याचा हट्ट धरतात. पीपीई किट घालूनच त्यांना स्मशानभूमीत येण्यासाठी प्रवेश दिला जातो; मात्र अग्नि देताना थरथरायला लागतात, अशावेळी शेवटी टीमपैकी कोणीतरी पुढे होऊन मदत करतो. त्यांचे दु:ख कर्मचाऱ्यांना वेदनादायक ठरते.

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मियांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी केला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योद्धे’ निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेनंतरच कुटुंबीयांमध्ये सहभागी होतात.

जितेंद्र विचारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश कदम, जोगेंद्र जाधव, प्रभाकर कांबळे, बबन बेटकर, संकेत कांबळे, रोहित आठवले, नितीन राठोड, संतोष राठोड, नरेश राठोड, सुनील माटल, हरीश जाधव आदींची दोन पथकांत विभागणी करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू असून, अंत्यसंस्कारासाठीचा सर्व खर्च नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.

कोट :

कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्‌ध्वस्थ झाली आहेत. मृतदेह घेऊन नातेवाईक येत असतात. दिवसाला १६ ते १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना आम्हालाही प्रचंड वेदना होतात. नित्य कुटुंबांचा आक्रोश, आकांत ऐकताना मानसिक त्रास होत असतो; मात्र कर्तव्यामुळे विसरून पुन्हा कामाला लागावे लागते.

जितेंद्र विचारे.