शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

अखेर कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांची वेळ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांना ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहराच्या ठिकाणी ...

रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषीविषयक सेवा देणाऱ्या दुकानांना ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहराच्या ठिकाणी ही दुकाने असल्याने ग्रामीण शेतकऱ्यांना या वेळेत खरेदीसाठी येणे अवघड होत आहे. पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत खरीप हंगाम लक्षात घेऊन ही वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी यांना काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणारी दूध, भाजीपाला तसेच बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक आणि रासायनिक औषधे तसेच अवजारे आदी कृषीविषयक सेवा देणारी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.

शिवाय शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. त्यावर चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते सकाळी ७ ते ११ या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले असून ही केंद्रे सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषीविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही झाली नव्हती.

अखेर गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत कृषीविषयक सेवा केंद्रांना लाॅकडाऊन काळात वेळ वाढवून देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता जिल्हाधिकारी तसा आदेश काढणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील शेतकरी दुकानांची वेळ कधी वाढणार, या प्रतीक्षेत आहेत.