शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याकडून वीज घेतली, तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ज्या कारणासाठी वीज मीटर घेतला आहे, त्याऐवजी अन्य कारणासाठी विजेचा वापर करण्यात ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ज्या कारणासाठी वीज मीटर घेतला आहे, त्याऐवजी अन्य कारणासाठी विजेचा वापर करण्यात आला, तर १२६ अन्वये वीजचोरीची कारवाई करण्यात येते. घर, शेती, बांधकाम, औद्योगिक, वाणिज्यिक प्रकारासाठी घेतलेली वीज जर अन्य दुसऱ्याच कारणासाठी वापरणे कायद्याने गुन्हा आहे. वर्षभरात जिल्ह्यात १४ लोकांवर कारवाई करण्यात आली असून, दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक याशिवाय पथदीप, पाणीपुरवठा आदी विविध प्रकारच्या वीज जोडण्यांचे प्रकार असून, प्रत्येकाचे युनिट दर वेगवेगळे आहेत. मात्र, काही वेळा अनावधानाने तर काही वेळा जाणीवपूर्वक वेगळ्याच कारणासाठी जेव्हा वीज वापरण्यात येते, तेव्हा वापर करणारा ग्राहक गुन्ह्यास पात्र ठरतो. अशा प्रकारच्या ग्राहकांना हेरून कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

कोरोनामुळे महावितरणकडून एकूणच कारवाईचे प्रमाण कमी आहे. वर्षभरात १४ ग्राहकांनी घेतलेल्या वीज मीटरचा अन्य कारणासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारवाई करून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात यश आले आहे.

१२६ अन्वये गुन्ह्यास पात्र

घरगुती, कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक आदी विविध प्रकारच्या वीज जोडण्याचे युनिटनुसार दर वेगळे आहेत. बांधकामासाठीही विशेष जोडणी घेतली जाते, परंतु ज्या कारणास्तव वीज घेतली आहे, त्यासाठी न वापरता अन्य कारणासाठी घेतली, तर १२६ अन्वये ग्राहकावर कारवाई करण्यात येते.

चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडा टाकून वीजचोरी, मीटरची गती कमी करणे आदी प्रकार आढळल्यास, संबंधित ग्राहकावर १३५ अन्वये कारवाई करण्यात येते. ग्राहकाला तडजोडीची एक संधी देण्यात येते. त्यामध्ये दंडाची रक्कम भरून ग्राहकाला वीज जोडणीची एक संधी देण्यात येते.

जर ग्राहकांनी दंडाची रक्कम भरण्यास नकार दर्शविला, तर मात्र फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकारच्या वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येते. शिवाय दंडाची रक्कम जास्त असेल, तर दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून माहिती देणाऱ्यास देण्यात येते.

ग्राहक ज्या कारणासाठी वीज घेतो, त्या कारणाऐवजी अन्य कारणास्तव विजेचा वापर करतो, हे कायद्याने गुन्ह्यास पात्र ठरते. काही वेळा ग्राहकांकडून अनावधाने घडते, तर काही वेळा जाणीवपूर्वक केले जाते. गैरप्रकार आढळल्यानंतर कारवाई करावीच लागते. त्यामुळे गैरमार्गाचा अवलंब करण्याऐवजी ग्राहकांनी कारवाई टाळावी.

- देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंता.