शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

स्वयंसेवक समितीची स्थापना

By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST

तंटामुक्त समितीचा उपक्रम : कोळोशीत नऊ जणांना ओळखपत्र वाटप

नांदगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले चोरीचे प्रमाण, ठिकठिकाणी आग लागून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान तसेच गावच्या वार्षिक उत्सवात लागणारी स्वयंसेवकांची गरज ओळखून महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोळोशीने सोमवारपासून नऊजणांच्या स्वयंसेवक समितीची स्थापना केली आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला वेताची काठी व ओळखपत्र वाटप करून एक जागृत उपक्रम हाती घेतला.वाढत्या चोरीच्या प्रमाणाला आळा बसावा, पोलीस यंत्रणेला ग्रामस्थांची साथ मिळावी व गावाच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेऊन काम करावे यासाठी तंटामुक्त ग्राम समिती कोळोशीने नऊ सदस्यांना ओळखपत्र व वेताच्या काठीचे वाटप केले. हे सदस्य गावातील प्रत्येक वेळप्रसंगाला गावातील लोकांच्या मदतीसाठी काम करणार आहेत. याशिवाय या पथकाकडून कुठे आग लागली तर पथकातील सदस्य ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करणार तसेच गावात होणारे वार्षिक उत्सवाच्यावेळी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडणार आहेत.यावेळी समितीचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी, सरपंच सुशील इंदप, उपसरपंच कृपाली इंदप, ग्रामसेविका एम. ए. लाड, पोलीस पाटील संजय गोरूले, दादा कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या काही दिवसात या पथकाला बॅटरी व शिट्ट्या वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)रात्रीची गस्त ठेवणाररात्री-अपरात्री गावात फिरणारी संशयित व्यक्ती, वाहन यांच्यावर नजर ठेवून अशा वाहनांची व व्यक्तींची या पथकाकडून चौकशी होणार आहे. संशयित व्यक्ती आढळल्यास त्याला पकडून त्याची माहिती पोलीस पाटलांमार्फत पोलीस स्थानकात देणार असल्याचे सांगण्यात आले. तंटामुक्ती समितीच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यामुळे चोऱ्यांना चाप बसणार आहे.फेरीवाल्यांवर करडी नजरजिल्ह्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात चादर विक्रेते व इतर फेरीवाले फिरत असतात. यामधील सर्रास फेरीवाले हे दुसऱ्या राज्यातील असून टोळक्या- टोळक्याने फिरत असतात. त्यांच्याकडे कोणताही पुरावा किंवा त्यांची पोलीस स्थानकात नोंद नसते. अशांची चौकशी करून गावात फिरण्यास या पथकाकडून अटकाव करण्यात येईल व पोलिसांना कळविण्यात येईल.